[९]                                                                                 श्री.                                                                           १६ जून १७९५.

 विज्ञापना ऐसीजे. मीरअल्लम वगैरेचे मनांत कीं गोविंदराव यानीं खरड्याचे सलूकांत आह्मांस सामील केलें नाहीं, बरें, काय चिंता आहे? नवाबास समजावून याची मध्यस्ती दूर करवीन, श्रीमंतानीं ऐकावें असें करीन, परंतु शेवटास नेईन. यांतील वास्तविक अर्थ पाहतां यांनी इतके जीदीस पडावें असें. मजकडूनही झालें नाहीं. खरड्यावर यास शरीक करावें तर अवकाश नाहीं. दुसरे शरीक झाले असते तर यासच चांगलें नव्हतें. बलके नवाबाचा रोष विशेष होता. या कामांत त्यांनीं षरीक नसावें, हें वास्तव मनांत नाहीं. सरकारचें वचन याशीं गुंतलें, यास्तव आणीकशी दोस्ती. सरकारास उपयोग तें करावयाचें. याजकरितां नवाबापाशीं बोलून पत्रें घेतलीं कीं, तहनामा ठरावयाचा यास्तव उभयतांस पाठवावें. तहनामे याचे विद्यमानें झाले ह्मणजे हे सरकार कामांत आले. तीं पत्रें, स्वामीचे रुबरू यांस दिलीं. स्वामीनींही आज्ञा केली कीं, तहनामा ठरावून आणावा, येथीलही न्यावा. ज्या दिवसाचें चिंतन करीत होतें। तो समय हाच आहे. याप्रमाणें खातरजमा करून सांगितलें. मी नवाबापाशीं आल्यावर कळंबचे मुक्कामीं उभयतांस बहुत बजीद झालों कीं, चलावें. कबूल न करीत. नवाबास दोन चार वेळा ह्मटले. मान्य करीनात. सरकारची आज्ञा कीं, तहनाम्याबरोबर त्यांजकडील गृहस्थ असावा. कोणास तरी द्यावें असे ह्मटलें. तेव्हां घासीमियास त्यांनीं दिलें. यांत मजकडून विरुद्ध तर झालें नाहीं. सरकारांतून कांहीं विपरीत व्हावें, तेंही नाहीं. असें असतां यांनीं मजवर रोष करून चुगल्या सांगाव्या असें नाही. मग एका गोष्टीविषयीं इतकें करीत असतील तर न कळे. कोणती गोष्ट ? यास खचीत समजलें आहे कीं, नवाबाचे दौलतींत सर्वाशीं यास ओळख. तसेंच महालांत वगैरे आमचेपेक्षां प्राचीन माहीत हे आहेत. लहान मोठे सर्व यांस ओळखतात. तेव्हां यांजवर आमचा दबाव पडणार नाहीं. कसेंही झालें तर हे आपल्यावर गालब राहतील, हें आपल्यास जड पडेल. याजकरितां इतका उद्योग असल्यास न कळे. असो; दोन गोष्टी माझ्या बळकट आहेत. एक तर मजकडून याशीं प्रतरणेची चाल नाहीं. दुसरी गोष्ट रात्रंदिवस मनांत हेंच वागत आहे कीं, नवाबाची दौलत स्वामीवेगळ असूं नये. दोहींचें ऐक्य असें असावें कीं, स्वामीनीं इकडील काळजी किमपि न करावी. असें करून दाखवावें. मग स्वामीची आज्ञा घेऊन स्वस्थ बसावें. ही चाकरी ईश्वरास मजपासून घेणें व इतर कोणाच्यानें कांहीं होत नाहीं. ज्याचें कर्म त्यास फलद्रुप होईल. रात्रंदिवस मजवर झोड आहे. कोणी असेंही येऊन सांगतात कीं, तुह्मावर बलवा होणार आहे. दहा वीस माणूस रात्रंदिवस बातमीवर फिरतात. लटकी बातमी किंवा खरी याचा विचार अधिकारीयांस नाहीं. बुद्धीस भ्रंश आहे. मुशीरुलमुलूक यांस बरें ह्मणविलें. किती तपशील लिहूं? स्वामीचे पायांचे ध्यान करून चिंता सोडली. पार पाडणार पाय आहेत. मी चिंता केल्यानें काय होणार ? स्वामीचे ध्यानांत सर्व यावें ह्मणून लिहिलें आहे. र॥ छ २८ जिलकाद. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries