[२३९]                                                                               श्री.                                                                          

विज्ञापना ऐसीजेः-अलीज्याह धारूरचा घाट उतरून शहागडाकडे गेले. जाबसालाचा नाद लावला. यामुळें सरदार फौजसुद्धां घाटावर राहिले. पाटलाग केला नाहीं. इंग्रजी पलटणें यांचें ह्मणणें, आह्मीं पंतप्रधान यांचे तालुकियांत जाणार नाहीं. याजमुळें नवाबाची मर्जी खपा, ही संधि असद अल्लीखान यांनीं पाहून दरबारांत मनस्वी भाषण, उच्चारूं नये ऐसें वाक्य मीरअलम व पागावाले यांस बोलून, नवाबास अर्ज केला कीं, यांच्यानें काय व्हावयाचें, गुलामास आज्ञा केलियास पाठलाग करून अलीज्याह यांस धरूनच आणीन, एवढी चाकरी तर माझी पहावी. याप्रमाणें गप्पा झोंकल्या. मर्जी खुष व्हावीं ऐसें बोललें ह्मणजे तो चांगला. परिणाम कसाहि असो. हें येथील ध्यान आहे. असद अल्लीखान यांचें बोलणें गोड वाटून पागावगैरे सर्वांवर राग. या सर्वांस इंग्रजी पलटणेंसुद्धां बोलावून रायचुराकडे पाठवावे. असदअल्लीखान व मुसारेमू, दिलदारखान, सरबुलंदजंग याजकडील यांस अलीज्याह यांजकडे पाठलाग करावयासी पाठवावें. मीरअलम यासी व अल्लीखान यासी बेबनाव, तेव्हां तेहि तेथें कामाचे नाहींत. त्यांस पुण्यास पाठवावें. तिकडील जाबसालहि ठरला पाहिजे. याप्रमाणें निश्चय होऊन, नवाबानीं राजश्री रघोत्तमराव यांजबरोबर सांगून पाठविलें तो मजकूर अलाहिदा लिहिला आहे, त्याजवरून ध्यानास येईल. र।।छ १६ रबिलाखर. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries