मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

सुरापुरकर व्यंकटपा नाईक यांचे                                                   लेखांक १८९.                                                      १७१५ चैत्र वद्य ३०.
पत्राचें उत्तर छ २८ साबान.

राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहिरीबाहादुर गोसावि यास-
5 सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीय लिा असावें विशेष पत्र पाठविलें तें पावलें पुण्याहून गोविंदआपाकडील पत्रें आली त्यांत नवाबाचे सरकाराचा ऐवज ती सालावर द्यावा ह्मणोन जाबसाल उरकला पैकी कांही चिटी आणऊन द्यावी बाकी गोविंदआपा आल्यावर पर्याय करून पाठवावें ऐसे ठरलें ह्मणोन व बंदगानअलीची स्वारी निघणार तालुक्यास उपसर्ग असो नये इत्यादिक ता लिहिलें त्यास यांचे सरकारचा जाबसाल बोलण्यात आल्यास किती दिवस जाले आपल्याकडून कांही एक ठराव होऊन न आला होली मोहगम लिहिणे लिहिलें त्यास मंत्रीसी बोलावयाजोगे जाबसालाचा निश्चय ठराऊन ऐवजसहित पत्रें पेशजी ठरल्याबमोजीब यावी ह्मणजे यांसी बोलण्यास नीट सांप्रत बंदगानअली छ २७ साबानी डेरेदाखल जाले दरमजल बेदरास येतात तालुक्यास उपद्रव न होण्याचा मार मंत्रीसी बोलण्यात येईल परंतु पेशजी जाबसालच अद्याप निर्गमात न आला त्यापक्षी कसें पडेल पाहावें तुह्माकडून जाबसालाचा निश्चय समजण्यात कांहीच येत नाही तेव्हां यांची समजूत तरी कोणे प्रकारें काढावी या गोष्टीची व पुढील आंदेशाची काळजी तुमचे चित्तात नाही असें दिसतें ही गोष्ट चांगली नाही ज्यांत तुमचे दौलतीची बेहबूदी ती गोष्ट अमलात यावी रा छ २८ साबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries