Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

राजश्री व्यंकटराव घोरपडे तालुके गजींद्रगड यांस पत्र                     लेखांक १८.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध ३.
छ २ राखर राजे राय-रायां यांस दिल्हें.

राजश्री व्यंकटराव घोरपडे गोसावी यांसी-
अखंडित-लक्षुमी-अलंकृत राजमान्य स्नो गोविंदराव कृष्ण आशिर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहित असावें विशेष नवाब बंदगानअली यांचे फर्माविण्यांत मजकूर आला कीं तालुके गजींद्रगड येथील आमचे आमलापैकीं आह्मी आपले सरकारांतून सादुलाखान बहादूर यांस कसबे गोऊर ही गांव जागीरीत दरोबस्त दिल्हा आहे त्यास टिपु सुलतान याजकडोन तालुका सुटला तो दरोबस्त आमचे सरकारांत आला असतां व्यंकटराव घोरपडे यांस चौथ मागावयास प्रयोजन काय त्यास येविसी आह्मीं येथून राव पंतप्रधान व मदारुलमहाम व हरि पंडतजी यांस पत्रे लिहिली आहेत त्यास तुह्मी घोरपडे यांस पत्र द्यावें याजवरून हें पत्र लिहिले असे कीं गजींद्रगड किल्ला व किल्याखालील देहात हे सरकारांत आहेत बाकी तालुका नवाब बंदगानअली यांचे सरकारांत त्याजपैकीं कसबे गोहूर खानमजकूर यांचे जागीरींत आहे तेथील चौथाईचे अमलाविसीं आपण मुजाहीम ने होणे येविसीं नवाब बंदगानअली यांची पत्रे सरकारांत गेलीं आहेत तिकडोन ही परभारें आज्ञा येईल तसे व्हावें सरकारआज्ञेस उजूर असूं नये रा छ २ र।।खर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.