मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

शेख इबादुलाचे पुत्रांनी पत्रें बळवंतराव सेळूकर                            लेखांक २२.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध ३.
व पांडुरंग रंगनाथ यांस मागितलीं सबब दिल्हीं.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बळवंतराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील जाणून स्वकीये लिहित असावें विशेष मौजे कामटें वगैरे देहे पांच पा नांदेड जागीर बादुलाखान येथील बाबतीचा अमल तुह्माकडे दरसाल मामुल बमोजीब तीनसें ऐसी टके देऊन रसीद घेतात ऐसें असतां यासिवाय इजाफा दरसाल पंधरासे टके तुह्मी अलीकडे घेतां येविसीचा बोभाट नवाबाचे सरकारांत जाला त्यावरून लिहिलें असे त्यास कैलासवासी रावसाहेब यांचे कारकीर्दीस मामूल चालत आल्याबमोजीब ऐवजाचा फडच्या करून घेत जावा ते न करितां इजाफा ऐवज घेऊन गांवास उपसर्ग देता हा बोभाटा येणें नीट नाहीं येविषई पेशजी पानगलचे मुकामींहून पत्र पाठविलें परंतु अद्याप बंदोबस्त होत नाहीं त्यास या उत्तरी सुदामत मामूल प्रा पांच गांवचा फडच्या करून घेत जावा गैरवाजबी उपद्रव देऊं नये फिरोन बोभाट न ये ते करावें रा छ २ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries