मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

तिमाराव हरी अमील देगळूरकर                                                  लेखांक १६७.                                                      १७१५ चैत्र शुद्ध ६.
यास पत्र जोती भास्कर याणी मागितले सबब.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तिमाराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष राजश्री जोती भास्कर हे कसबे कोंडलवाडी एथे मुलेंमनुष्येंसहित पूर्वीपासोन फार दिवस राहत आहेत यांचे घरी चिरंजिवाचें लग्न सालमारी त्याचे साहित्य पानपत्रावळ लांकूडफांटे फरफर्मास सरंजाम कसबेमारी ताकीद करून देवावा व कामजकूर एथें मारनिलेची असामी चिरंजिवाचे नावें दरमाहा रुो पांचप्रा मीरबदरुदीन हुसेनखां यांचे अमलांत चालत आली त्यास मारनिले पदरचे यांचा अगत्यवाद धरून चालत आल्याप्रा असामीचे वेतन यांजकडे चालवावें हरएकविषई यांजवर ममता करीत जावी मानिलेकडे कर्जवाम साहुकार वगैरे लोकांचे आहे त्याचा उपसर्ग यांस न होय कोणी तंटा तगादा यांस न करी ऐसें करावें यांचे अगत्य जाणून लिा असे तरी पूर्ववत्. प्रा असामी चालवावी विषय बहुतसा नाही कोणाचा उपद्रव न लागे ऐसे करावें रा छ ५ साबान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries