मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

मीरअलमबाहादूर यांचे                                                              लेखांक १६५.                                                      १७१५ चैत्र शुद्ध ६.
मागितल्यावरून हरदो मुसज्ञापत्रे
दोन बहेरीबाहादूर यांचे नावें
लिहून एक हवाले तापीराम
वकील बाहादूर मवसूफ व दुसरें
पत्र इवाले सिवशंकरपंत
वकील निा बहेरीबाहादूर छ ५
साबान सन १२०२ फसली.

राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहेरीबाहादूर मुतहवरुदौला रोबजंग बहरुलमुल्क गोसावि यांसि-
७ सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावे विशेष मौजे मिरवेल व मजरे व्यंकटापूर पा रायचूर हे गांव मीरअलमबाहादूर यांचे जागीरीत तेथें तुह्माकडोन उपद्रव लागो नये ह्मणोन पेशजी लिहिलें असतां हाली बाहादूर मवसूफ यांचे एथें वर्तमान आलें की सुरापूरकर यांची जमयेत रामदुर्गाहून स्वार प्यादे येऊन मीरमजकूरचा मालमहसूल घेऊन गेले याजकरितां तहसील बंद व लोक परागंदा जाले आहेत त्यास येविसीचा बंदोबस्त जाला पाहिजे त्यास बाहादूरमवसूफ याणी बजीनस पत्रच आह्माकडे पाहावयास पा त्याजवरून हे पत्र लिहिलें असें की हे करणें ठीक नाही याजमुळें कितेक कामात खलल आहे त्यास याउपरि मजरेमारचा मालमहसूल वगैरे काय जिनस नेला असेल तो जराबजरा देऊन रसीद घेऊन पाठवावी पुढें गावास व मजरेमजकुरास कोण्हेविसी उपद्रव न करावा फिरोन बोभाट न ये असे व्हावें रा छ ५ माहे साबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries