मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

गोविंदराव कोकाटे यांस पत्र                                                           लेखांक १६६.                                                      १७१५ चैत्र शुद्ध ६.
जोती भास्कर यांजपासी दिल्हे.

राजश्री गोविंदराव यशवंतराव कोकाटे गोसावि यांसि-
5 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष तुह्माकडील मामलतीचे कार्याकरितां राजश्री जोती भास्कर एथें होते त्यास सन ११९९ पावेतो जागीरदार व खालशाकडील नगदी ऐवजाचा फडच्या पेशजीच मारनिलेपासी करून दिल्हा राजे शंकरराव भोंग यांचे नावें नवाजषनामा नवाबाचे सरकारचा ता चोलाखे वगैरे पा बासर व सिरपूर वगैरे पा इंदूर एथील सन १२०० व सन १२०१ दुषाला घेऊन मारनिलेस दिल्हा त्यांची तनखा माहली घेऊन मारनिलेचे स्वाधीन केली फडच्या करून घ्यावा सन १२०२ सालचाहि नवाजषनामा तयार करविला आहे हरकारे यांजकडील अमील एथें होते त्यांजकडील जाबसालाविषई पूर्वी तुह्मास लिहिलें तुमचे उत्तर आलें कीं माहलीच जमीदाराचे मारफातीने फडच्या करून घेऊ त्यावरून आमील एथून माहली गेले आहेत वाजबीप्रा जाबसाल तेथे विल्हे लाऊन घ्यावा ता जोतीपंत सांगतील त्यावरून कळेल तुमचे कामास अनमान व्हावयाचा नाही रा छ ५ साबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries