Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक २२.

१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.

पुरुषोत्तम महादेव यांचें पत्र नानांस :-
विनंति कीं, महबुबअल्लीखान नामें खोजा याजला जैपूर-प्रांतीं नजबखानांनीं पाठविलें. प्रांत हस्तगत केलियावर यांची सरदारी मोडून अनुपगीर गोसावी यास ते प्रांतीं पाठविलें. यास्तव ते अजुर्दा होऊन मकाणास गेले. ५-७ लाख रुपये आपले पदरीचें खर्चून फौज जमा केली. प्रांत हस्तगत केलेला गेला. पुढें याजपासून नाउमेद होऊन ते प्रांतीं आले आहेत. नजबखानांनीं बहुत मित्रता केली; परंतु न मानिलें. येथून चलते समईं स्वामीस विनंति लिहावयास सांगून पत्रें दिधलीं ते पाठविलीं आहेत. मर्जीस आल्यास उत्तरीं सनाथ करावें. वजिराकडील प्रांतास वाकीफकार, व सिपाई, व सरदारीचा ठसा त्याच्याकडे कुरेप्रांतीं चाललाच आहे. यास्तव ममतेंत घेऊन स्वामीचे कृपेचे उमेदवार केले. त्यासी करार केला आहे कीं, मला पाहून स्वामीपासीं जाणें, तु चे योग्यतेप्रमाणें मातबर सरदारी तुम्हांस पुढें पाठवून घेऊन जातील, व कांहीं फौजेची सरदारी देऊन अंतर्वेदीचे अथवा हरयेक जुजाचे कामास तुह्मांस पुढें करितील. याप्रों बोलून रवाना केलें. ते कदाचित् आपलेपासीं आले तर ममतापूर्वक आदरसत्कार करून संग्रहीं ठेवावें. या प्रांतीं त्याचे सलुकानें शत्रूचें मातबर फुटून सरकारचे अंकित होतील. पत्रोत्तरें पाठवावी. त्याचे बंधू येथें आहेत. त्याचे पासीं पावते करतील. म्हणजे खातजमेनें सेवेसी येतील. श्रुत होय. या दिवसांत यशवंतराव वाबळे यांनींजैपूर प्रातीं येऊन प्रांतांत दंगा केला. तेव्हां महाराज जैपूरकरांनी फौज पाठवून जुंजांत धरून घेतले. त्यांचा पुत्र ठार जाला. दोनतीनशें घोडीं लूटराजे याचे घरीं पावली व अंबरेचे किल्ल्यावर राजे खुशाली-राम कैद आहे तेथेंच त्यासही ठेविलें आहे. छ २ साबानीं कुवरसेत नामें खर्ची पूर्वीपासून पुणियांत आहे. त्याची पत्रें नजबखान वगैरेस आलीं ते बजिनस धरून पाठविलीं आहेत. तेथें शहरांत असतां इंग्रजांची वरिष्ठता लिहितो. याकरितां पूर्वीही पत्रें धरून घेऊन सेवेशीं पाठविलीं व हालीं पाठविलीं आहेत. नजबखानास अर्जी लिहिली आहेत. त्यावरून वृत्तव्यंग लिहिलें तें श्रुत होईल. वरकडाची पत्रें आहेत त्यांचा विस्तार त्यांचेच पत्रांवरून विदित होईल. गरीब पोटार्थी आहे. यास्तव हरकोठें पांच सात रु।। दरमा करून तेथून दूर ठेवावें. तेथें राहिल्यास स्वामींचे राज्य श्रीमहादेवाचें आहे, उत्कर्ष अधिक, गुह्य गोष्टही प्रकट होते, यास्तव लिहिलें असे. श्रुत होय. कृपा केली पाहिजे. दर्शन-लाभ होय तो सुदिन. छ ११ साबानीं वर्तमान आलें कीं, राजश्री महादजी शिंदे यांनीं इंग्रजांची फौज मारून ताराज केलीं, हजार बारासे माणूस राहिलें तें दो ठिकाणीं कोंडिलें आहे. वरकड गोहदकर व भदावरकर वगैरे व त्यांचे लोक गछ करून गेले तें वृत्त शेवेसी पावलेंच असेल. ईश्वर स्वामीचा प्रताप अधिकोत्तर करो. दर्शन-लाभ होय तो सुदिन. हे विनंति.