Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक २५.

१७०२ श्रावण वद्य ११.

पु।। श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्रीं आज्ञा कीं : पेशजी कर्णल गाडर कलकत्त्याहून आला तो सुरतेस होता. तेथून पाण्याचे मार्गे अडचणींतून आपले जमावानिसीं ममईस आला. ममईकरासी व त्यासी कोशल जालें. तेव्हां कोकणांत वसईवर हंगामा शुरू करितील असें समजून, वसईत सरंजाम पाहिला होताच, आणखीही सरंजाम पोख्त करून मजबुदी केली होती. त्यास, इंग्रेज येऊन वसईस नमूद जाले. त्याजवरून सरकारांतून रामचंद्र गणेश बेहेरे फौज व सरंजाम किल्ल्याचे कुमकेस पाठविले कीं, एकीकडून किल्ल्याचा मार व दुसरीकडून फौजेचा महासरा, येणेंकडून मुखालिफ याणें आयास येऊन अंदेशांत यावें. त्याप्रों मारनिल्हे फौजसुध्दां जाऊन पोहोंचले. इतकियांत हरामखोरांनीं वसईचा किल्ला इंग्रेजांचे हवालीं केला. या उपरांत रामचंद्र गणेश यांची व इंग्रजांची लढाई चांगली जाली. ते लढाईंत खासा रामचंद्र गणेश कांहीं लोक कामास आले व इंग्रजांकडील कांहीं लोक व सरदार ठार व जायां जाले. त्यानंतर सरकारचे फौजेंत त्यांचे पुत्र माधवराव रामचंद्र होते ते फौजसुद्धां इंग्रेजांस महासरा देऊन राहिले होते. मागाहून राजश्री हरिपंत यांस बमय फौज हुजुरांत व तोफखाना व पायदळ बोरघाटाचे खालीं गाडराचे मुकाबिल्यास पाठविले. राजश्री तुकोजी होळकर इंदुरास होते त्यांस पत्रें सरकारांतून पाठविलीं होतीं कीं, तुह्मी आपले फौज- सरंजामसुद्धां निघोन, खानदेशांतील सुलतानपूर, नंदुरबार येथें केशवपंत दातार व रामचंद्रराव पवार दोन चार हजार फौज व दोन पलटणें इंग्रजी व तोफा असा जमाव करून हंगामा केला आहे. त्यांना गणेशपंत बेहेरे सरकारांतून फौजसुध्दां आहेत. तेथें तुह्मींही येऊन, केशवपंतास तंबी पोंचून, दरमजल हुजूर यावें. त्यावरून होळकर बमय फौज व सरंजाम निघोन, नंदुरबारेस येऊन गणेशपंत बेहेरे व आपण मिळोन, केशवपंत याची तंबी करोन, दोन पलटणें गारद केलीं. च्यार तोफा व दोन हत्ती व दोन हजार बंदुका, घोडी वगैरे सरंजाम पाडाव आला व चंद्रराव पवार ठार जाले. केशवपंत एकलाच पळून झाडींत गेला. उपरांत गणेशपंत यासी सुरत-प्रांतांत ताख्तोताराजी करावयास रवाना केलें. तुकोजी होळकर दरमजल हुजूर आले. श्रीमंतांची भेटी जालियावर राजश्री हरिपंत यांजकडे रा। केलें. ते बोरघाटावर जाऊन पोहोंचले. इतकियांत गाडर वसईहून निघोन बोरघाटाचे रोखें अडचणींतून येऊं लागला. तेव्हां राजश्री हरिपंत व पुढील फौज मिळोन, दोन टोळया करून, उर्फास महासरा देऊन तोफाचा मारा होत होता. परंतु तेथें मैदान नाहीं, अडचणीची जागा, फौजेनें निकड केल्यानें काम होणार नाहीं, सबब मैदानांत आणावयाचे तजविजींत होते. इतकियांत इंग्रेज मगरूरीनें बोरघाट चढून घाटमाथा आला. त्यानंतर राजश्री परशरामपंत मिरजकर याणीं, दहा हजार फौजेनिसी कोंकणांत इंग्रेजांचे पिछाडीस रसद बंद करून पायबंद द्यावयाकरितां पाठविले आहेत, त्यांनीं दोन हजार बैल गल्ल्याचे व किराण-बाबेचे छकडे वगैरे रसद जात होती ते मारून आणिली. घाटावरते इंग्रेजांचे मुकाबल्यास राजश्री हरिपंत व होळकर तीस हजार फौज व तोफखाना व पंधरा हजार पायदळ समेत आहेत. रोज लढाई सुरू आहेत. इंग्रजांकडील दोन तीन सरदार व कांहीं लोक गोळ्यानीं व बाणांनीं ठार जाले. त्यांचे लष्करांत रसद पोंहचत नाहीं. याजमुळें महागाई फार आहे. दहा अकरा पलटणें व तीस पस्तीस तोफा व एक हजार तुरुकस्वार याप्रमाणें त्यांचा सरंजाम आहे. घाटाखालीं व घाटावर सरकारी फौजा आहेत. सबब इंग्रेज बहुत फिकिरींत व अंदेशांत आहे. घाटावर ज्या अडचणींत राहिला आहे तेथेंच आहे. कुच करून पुढें येत नाहीं. राजश्री हरिपंताचे पुस्तगर्मीवर आह्मीही दहा हजार फौजेनिसी आठा दहा कोसांचे फासल्यानें आहों. ह्मणून लिहिलें तें सविस्तर अक्षरशहा फारसी करून पातशहास व नबाब नजबखानास येथें वर्तमान आगाऊ आलें नवतें तें समजाविलें. त्यास, हें वर्तमान ऐकोन आपली स्तुत तर्तुदीची बहुत केली कीं, आज आठ वर्षें जालीं. घरच्या धण्याचा फितूर व मुख्य धनी तो लहान नादान असें असोन, इंग्रजांचें जुंज आजपावेतों मोडिलें व पुढें लढाईस मुस्तेद आहेत, हें काम दक्षणचे सरदारांचें कीं इतके दिवस ठरून राहिलें, ईश्वर कारभारी व सरदार मुत्सद्दी प्रौलतीस द्यावें तर याप्रों द्यावें ! ह्मणून बहुताप्रकारें स्तव करून बोलिले कीं, श्रीमंत माधवराव यांचे ताले सिकंदर कीं, हैदरनाईक जुंजास षरीक जाला, राजश्री नानानीं इतकी मेहनत करून दौलत राखली आहे त्याप्रों पुढेंही मजबूद असावें, व इंग्रजांचे फंद फरेबांद येऊन त्यांसी सलूख किमपि न करावा, कदाचित् इंग्रेजांनी बदलून सलूक केला तरी पुढें सरंजाम करून प्रांत घ्यावयासी चुकणार नाहीं, याजकरितां सलाहच आहे कीं, इंग्रेजांस मारून त्यास नेस्त-नाबूद करावें, यांतच सर्वांचे रूप आबरू आहे, नाहीं तर जळचर पृथ्वीचे धणी जाले तर घोडयास पागोटयाची आबरू रहात नाहीं ! याप्रमाणें बोलून आपले ईश्वराचें नांव घेऊन श्रीमंतास आशीर्वाद दिधला कीं ईश्वर त्यांस यश दे आणि इंग्रज नेस्तनाबूद होत, यांतच सर्वांचे कल्याण आहे ! याप्रमाणें भाषणें जालीं. व हेही बोलिले कीं, माधवराव जाधवराई कोण आहे त्यास इंग्रजांचे बोलाविल्याप्रमाणें सलुकास पा।, त्यास काय ठरलें ? तेव्हां आह्मीं उत्तर दिल्हें कीं, सलुकास पाठविलें नसेल, यांनीं बोलाविलें असेल; तर त्याचा मनोदय व लांबीरूंदी पहावयासी पाठविलें असेल. हें वृत्त आह्मास आलें नाहीं, लिहून उत्तर येईल ते अर्ज करूं ह्मणून बोलून सेवेसी श्रुत व्हावयाची विनंति लि॥ आहे. तरी कृपा करून जाबसाल काय लागला आहे ते लिहावयासी आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. दर्शनलाभ होय तो सुदिन. हे विनंति.