मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६३६

श्री.
१७२४

राजश्री येशवंतराव होळकर यांस पत्र कीं, प्रो देवासे निा राजश्री तुकोजी पवार व आनंदराव पवार यांजकडे सरंजामास सरकारांतून आहे. त्यास, तुह्मांकडील पठाण यांणीं माहालीं मोठा प्रळय करून लाखो रुपये खंडणी, खेरीज खर्च, मनस्वी घेतला. त्याखेरीज माहालची तसनस बहुत केली. महालचे रयतीची कांहीं स्थित राहिली नाहीं. दोन सालांचा वसूल रुो अनर्थ करून नेला. तुह्मांस राजश्री खंडेराव होळकर यांचीं पत्रेंहि गेलीं असतां, मनाई जाली नाहीं, तुह्मी श्रीमंतांचे घरचे असतां सरकारचे सरदार यांचे माहालास उपद्रव द्यावा, सरदार यांणी चाकरी कशावर करावी, हा अर्थ ध्यानांत न आणितां, ऐसा अर्थ घडला. या उपरी देवासें माहालावर तुह्मांकडोन कोणेविशीं उपद्रव होऊ नये. येविशीं आपले सरदारांस निक्षूण ताकीद करून, बंदोबस्त करून, पत्राचें उत्तर पाठविणे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries