मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५८५

श्री.
१७२४ आषाढ वद्य ६

अज नवाब अमीरतदौला बाहादर ता। कमाबीसदारान जमीदारान मौजे कायगांव सुा। सलास मयातैन व अलफ, स्वारी याप्रातीं नजीक आली. आपले गांवास उपसर्ग होईल, सबब, अमरसिंग हलकारा पाठविला आहे. हा गांवचा बंदोबस्त आपणास सांगेले त्याप्रों करणें. च्यार स्वार ठेऊन, बाकी स्वारांस रवाना करणें, गांव घाबरें न होय, लोक जनांत आह्मांवर निमित्य न ये, तें करणें. आह्मांस सरकारआज्ञा कीं गंगातीरीची गांवें यांसीं

मुजाहीम न होणें. येविशीं आज्ञा ह्मणोन लिा असे. खातरजमेनें गांवचा बंदोबस्त ठेऊन राहणें. रा। छ १९ मोह रा।वल मोर्तब सुद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries