मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५८७

हू.
१७२४ श्रावण शुद्ध १

भाई नबाब अमीरउद्दौला बाहादर महफुज बाषंद:-

अजिदिल एकलास पाराशर दादाजी व गोपाळराव गोविंद सलाम आंकी, येथील खैरखुषी जाणोन, आपकी खैर हमेशा कलमें करीत असावें, दिगरः आपलेकडील ठाणें कसबें गांडापूर येथें आलें आहे, तेथून क्षेत्र कायगांव येथें स्वार पाठविले आहेत, म्हणोन क्षेत्रींचे ब्राह्मणांचे सरकारांत बोभाट आले. तेव्हां श्रीमंतांनी आम्हांस आज्ञा केली. त्याजवरून आपणास लिहिलें आहे. तरी ठाण्यांत कोण असेल त्याजला निक्षूण ताकीद पाठऊन, स्वार पाठविले असतील त्यांस मनाई पाठऊन, एक पैसा खर्च न घेतां, उठऊन न्यावे. व क्षेत्र टोंक व प्रवरासंगम व कायगांव ह्या तीहीं क्षेत्रींचे ब्राह्मण माहान समर्थ यजमान साहेबांचें कल्याणच इच्छून आहेत. त्यांस उपद्रव जाल्यानें कल्याणदायक नाहीं. व यजमानसाहेबांचें हि सांगणें आपल्यास आहे. त्यापेक्षा आपल्याकडून क्षेत्रास उपद्रव होणार नाहीं. परभारें आपल्यास न समजतां उपसर्ग होईल.तरी क्षेत्रास हरएकविर्शी उपद्रव न लागतां रखवाली होय तें करावें, क्षेत्रींचे ब्राह्मण आपल्याकडे येतील. त्यांस अभयपत्र देऊन, ब्राह्मणांत्ते समाधान व श्रीमंतांच्या मर्जीचा संतोष, व आपले यजमानाच्या कल्याणावरतीच गोष्ट द्यावी. आपण सुज्ञच आहां. त्यापक्षीं विशेष काय लिहावें ? रा छ २९ रविलावल ज्यादा काय लिहिणें ? प्यार मोहबत असों दीजे, हे किताबत.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries