मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५६२

श्री.
१७२४ वैशाख वद्य १

श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री नानाजी दीक्षित स्वामीचे सेवेसीं:-

विद्यार्थि गणेश शिवराम कृतानेक सां नमस्कार विज्ञापना. आपण पत्र पा तें पावलें. मालेगांवींहून तुमचें येथें पत्रें आलीं. त्यांत येशवंतराव होळकरयांचे लष्कराची बातमी काय आली ते लिहावी, म्हणोन आज्ञा. ऐशास, मालेगांवाहून श्रीमंत राजश्री गोपाळरावबापा यांची पत्रें परवां आलीं. त्यांत मार येशवंतराव होळकर थाळनेरास आहेत. पंचवीस हजार फौज व पेंढार वगैरे चाळीस हजार परियंत जमाव आहे. काशीराव होळकर येशवंतराव याजपासून निघोन सेंदव्याचे किल्यांत गेले. ते तोफा फिराऊन किल्याचा बंदोबस्त करून आहेत. काशीराव आपलेपासून निघून गेल्यामुळें, येशवंतराव यांस अविश्वास होऊन, खानदेशांत माने यांज समागमें काशीराव यांजकडील आचंबेसिंग व गणपतराव नारायण दिवाण होते, त्यांस माने यांजला येशवंतराव यांणी लिहून कायद करविलें, आणि माने अंमळनेरचे सुमारें होते व शहामतखान पठाण माचलपुरावर होता, त्यांजला निकडीनें आपले जवळ बोलाऊन नेलें. झाडून जमावसुधां येशवंतराव थाळनेरावर आहेत. एक रोंख दक्षिणेवर यावयाचा व एक बेत बराणपुराकडे जावें. असे दोन बेत आहेत. बातमीस माणसें गेलीं आहेत. पुढें वर्तमान येईल तसें लिहू. या अन्वयें मालेगांवचे पत्रांत मार आहेत. स्वामीस कळावें. पुढें समजल्यासारखें विनंति लिहिल्यास, आज्ञेप्रमाणें आळस करणार नाहीं. आपण मालेगांवीं माणूस पाठविलें आहे, तें आज यावेंसें आहे. त्यांस, आलें ह्मणजे अलीकडील तिकडे काय वृत्त असेल, तें कळेल. मजलाहि पत्र आलियावर अधिकउणें कळविण्याविशीं आज्ञा असावी. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञाप्ति

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries