मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५६०

श्री.
१७२४ वैशाख शुद्ध १०

सहस्त्रायु चिरंजीव रा। शामराव नाना यांसी गणेश शिवराम आशीर्वाद उपरी येथील कुशल ता. वैशाख वा १० मुा केा। नेवासें येथें यथास्थित असों. विशेष. तुम्हीं श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न रा नाना दीक्षित कायगांवकर यांचे मानसा समागमें शेनवारचें पत्रें पाठविलीं ते मंगळवारी साहा घटका रात्रीस पावलीं. मार अलाहिदा तुमचें पत्र आमचें नांवें होतें, त्याजसुधां सविस्तर समजला. ईश्वरें मोठें अरिष्ट आणिलें. प्राण वांचणें कठीण जालें. याजकरितां तुम्हीं इकडील सला न पाहतां सर्व मंडळी निघालां, हें बहुत चांगलें केलें, येथे येऊन पोंहोचावें. मग पुढें श्री जसें घडवील तसें घडवो. तेथील बंदोबस्त करून लौकर निघोन यावें. लोभ कीजे. रा मिती वैशाख वा ९ मंगळवार प्रथम साहा घटका रात्र हे आशीर्वाद.

राजश्री रामचंद्रपंत आपा स्वामीस सा। नमस्कार विनंति उपरी चिरंजीव शामराव मंडळीसुधां निघोन येतात, त्या पक्षीं मागें मालेगांवीं आतां तुम्हीच आहां, आणि चिरंजीव असले तर विलग ! वेळ प्रसंगास तुम्हांशिवाय दुसरियाचें धैर्य काय आहे ? मुलें लेकरें प्राण वांचून मात्र येतात. परंतु यज. मानाकडील वस्तभाव किल्यांत आहे. त्यांची तजवीज अगोदर लिहिल्याप्रों करून माणिकपुजास रवाना करावा. तो माणिकपु जहि जागा बांकी नव्हे जाणून, तेथेंच ठेविलीं. त्यास, हें आपलें माथां मोठें अपयश आहे. बरें वाईट जाल्यास तोंड दाखवावयास जागा नाहीं. याजकरितां आतां तुमचे प्राण वस्तभाव जवळ आहे. कळेल तसें संरक्षण करून, आह्मांस वर्तमान कळवीत जावें. लोभ कीजे. हे विनंती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries