मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५२६

श्री.
१७२३ अधिक ज्येष्ठ वद्य १२

शेवसीं विनंति. सेवक सदाशीव आपाजी चरणीं मस्तक ठेऊन शिरसांष्टांग नमस्कार विज्ञापना ता। अधिक वद्य द्वादशी मुा। अष्टें स्वामीचें कृपेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष, अधिक पौर्णिमेचें पत्र स्वामी से लिहिलें आहे तें पावलेंच असेल. येथील मार तर: मिरखां याचा भाचा जमशेरखां व शामहमदखां पठाण यांणीं अक्रा हजार रुो खंडणी घेऊन आणि माहालापासून गांव गांव खंडणी करून पंधरा वीसपर्यंत ऐवज नेला. देवीपु-याचे जवळ जाऊन काम करून गांव जाळून टाकला. खंडणी यजद माहालची ठरली होती, तिचा ऐवज पाठविला. शिवाय आणखी ठेऊन घेतला असतां नेल्या आहेत, सोडूं देत नाहींत. माहालची खराबी बहुत केली. लावणीचे दिवस. एक एक या गांवचे निस्त्रुक बैल एक राहिला नाहीं. दाणा वेगळे गेले. रयतेची या वेळेस बहुत खराबी जाली. खातरजमा करीत आहेत. काय लावणी होईल ती खरी. पेंढारी यांचे स्वार त्याचे फौजेंतूनच कांही माहालांत रखवालीस चालीस आणिली आहेत. पेंढारी यांचे फौजेचा जमाव बहुत जाला आहे. मीरखान यांचीं व होळकराची पत्रें त्यास अणिलीं. परंतु खातरेंत पत्रें ठेविनात व धूम मनस्वी करू लागले. याजकरितां त्यांसी बोलावयाकरितां येथून मीरजीस सो बापूजी गोविंद कमाविसदारांनी पाठविले होते. त्यास कांही ऐवज द्यावा असें ठरऊन स्वार च्याळीस माहालांत रखवालीस आणले आहेत. ऐवज ठरला तो आपणास समजला नाहीं. किती ठरला असेल ती लिहून पाठवीन. सुज्यालपुरचें वर्तमान रो बाबूराव बाबांनी लिहिलें आहे. सविस्तर कळेल. जमशेरखां पठाण याची फौज शिकारपुर परगण्यांत गेली. त्या वेळेस येथून पागे, गांवशिबंदी, सवार कसब्याकडे पाठविलीं. पांचच्यार दिवस तेथें सरंजाम राहिला. पुढें फौज निघून देवीपु-याकडून गेली. शैवसीं विनंती. सेवक सदाशिवचरणीं मस्तक ठेऊन शिरसा नमस्कार विज्ञापना. शिबंदीची रवानगी अष्टयास तेथून माघारी केली. गगा दोंतीन दिवस राहिली. तेव्हांच ही रो रामराव आपाजी देईनात. ह्मणों लागले. *

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries