मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
पु॥. राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं,

विनंति उपरि. ‘वाबले प्रकर्णी पत्रें तुह्मीं पाठविण्याचा त।। पेशजी लिहिला होता. त्याप्र।। मध्यस्तासी बोलणें जालें इत्यदिक पेशजी लिहिल्यावरून कळलें असेल, मध्यस्तांनीं बाबाराव यांस पत्रें देण्याची ताकीद केल्यावरून बाबाराव यांनीं पत्रें आपली दिल्हीं तीं र॥ केलीं आहेत बि।। .
१ पाटीलबावांस.
१ आबा चिटणिस,
१ कल्याणराव,
१ हरि नारायेण यांचे पत्राचें उत्तर.
----

येकूण चार पत्रें खुलीं बेगोंदै   प॥ आहेत. प्रयोजन असल्यास देऊन, बंदोबस्त करणें तसा करुन घ्यावा. मध्यस्तांनीं ‘आपलें पत्र कल्याणराव । यांस देतों' ह्मणोन बोलले. पत्र आलें ह्मणजे रवाना करूं. पाटीलबावांस मध्यस्त आपलें पत्र देत नाहींत, याचा त।। अलाहिदा त्यांचे बोलल्या प्रा। लिहिल्यावरून कळेल. र॥ छ० २ जिलकाद हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries