Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

४ बडे खानाची चिठ्ठी गोपाळराव भगवंत याचे नावें आली. त्यांत मजकूर कर्णेल साहेब बदादूर याणी सांगितले आहे कीं दौलतराव शिंदे याजकडील पेंढारी नबाब असफजहा बहादुर याचे तालुक्यांत हंगामाकरतां व शिंदे याचे कारभारी याचा इरादा ऐकण्यांत येतो कीं नबाबचे तालुक्यांत खटला रहावा, नबाब सर्व प्रकार कंपनी सरकारचे सर कतीविषयीं सामील व सराफ आहेत. त्यापक्षीं नबाब साहेबाचे मुलुख व महालाचे संरक्षण कंपनी बहादुरचे सरकारास लाजीम आहे. त्याचा इतजा काशी मल्हार याचे विद्यमानें दौलतराव शिंदे यास लोक श्रीमंताचे खिजमतीस तवमदारूनमहा सैतक करावी ह्मणोन चिट्टी छ. ६ जिलहेज सन तिसा ती सैनात-आली तिची नक्कल राबीसन यांचे कागदांत आहे. त्यावरून.

१ टिपू सुलतानावर पलटणीची स्वारी कंपनी सरकार नबाब पेशवे या तिन्ही सरकारानी सरकतीनें केली. तेव्हां तहनामा त्यावर टिपू सुलतान मारेसबंदरचे फराशिसासी माराकत व रिफाकतीचे कौल करार करून त्याची नेमत कुमकेस आणिले व इंग्रजाचे सरकाराशी लढाईचा इरादा ठेवून फौजेची तयारी केली. त्याजवरून तिनीशरीक सरकारांतून मसलत करावयाची तदबीर केली. त्याप्रकरणीं वकीलाचे जबाबास सवाल आले व जनराळाची व नबाबाची पत्रें आली. त्याच्या नकला व तरजुमे वगैरे राबीसन साहेब याजवळचे कागदांत निघाले. त्यावरून मसलत प्रकरणीं मजकूर साराश लिहिला आहे.

१ कर्णेल प्रालकर यानी छ. १८ जमादी केवल सन तीसतिसैन । आश्विन व॥ ५ मीस नाना फडणीस याजकडे येऊन सवाल केले व त्याचे जबाब आले. तीं कलमें येणेंप्रमाणे—

१ टिपूचे मसलत प्रकरणी तीन महिने श्रीमंताशीं बोलत आहों. आपल्यास इनाम असेल, आपले सरकारांत घरचे मझ्याकमुले याचा विचार कांहीं दिसत नाहीं. फरासीस टिपू यास सामील आल्यावर मसलत जड पडल्याची तदबीर व्हावी. त्याचे उत्तर नानानी केलें कीं, हे पहिलें करारांतच आहे. परंतु तिन्ही सरकारची पत्रें टिपूस पाठवावयाचे ठरलें होतें त्याचें काय झालें ? टिपूकडील उत्तर येते ह्यणजे पुढील अर्थ समजतां त्याजवर कर्णेल बोलले हें कलम त्यांतून जाब आला नाहीं. जनराकचे ख्यालांत असे असेल कीं, अगोदर तयारी करून मग पाठवावें. उत्तर समर्पक न आल्यास विचार करणें तो करावा. उत्तर आल्यावर मग तयारी करण्यास लागावें. तें ठीक नाहीं. असें कियासा वरून दिसतें.