मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

वो राजश्री वरदराजाच्यार्य मणूरमाशालकर                                     लेखांक १०५.                                                         १७१४ पौष वद्य १४.
यांचे पत्राचा जाब रा छ २७ जावल सन १२०२.

वेदमूर्ति राजश्री वरदराजाच्यार्य स्वामीचे सेवेसी-
विद्यार्थिं गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित असिले पा विशेष आपण पत्र पा ते पाऊन मारि समजला मौजे दिकसिंगी पा अफजलपूर हा गांव आह्माकडे बहुत दिवस स्वराज्या व जागीर सुधा होता दरम्यान जागिरीचे अमलास खलेल जहाला नंतर सरकारचे वकिलानी जागीरदारांसी बोलून तीनसे रुपये मख्त्यावर करार करून दिल्हा तो आजपावेतो चालला हाली सिदी इमामखान आले याणी हरकत केली आहे त्यास येविसी आपण बंदोबस्त करून दिल्हा पा ह्मणोन राजश्री नरसिंगराव कारकून यांस पा त्यास आपले लिहिल्यावरून नवाब अजमुलमुलूक बाहादूर यांस सांगोन त्यांचे पत्र सिदी इमामखान बाहादूर यांचे नांवे करून दिल्हे आहे की तीनसे रुपये दरसाल घेऊन मौजे मजकूरचा जागीर व स्वराज्याचा अमल चालवणे तुह्मी मुजाहीम न होणे त्यास पत्र नरसिंगराव घेऊन येतील त्याजवरून सविस्तर कळेल याउपरि गांव चालावयास दिकत होणार नाहीं रा छ २७ जाविल बहुत काय लिो लोभ असो द्यावा हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries