Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

श्रीशके १५९० कीलक नाम संवत्सरे फाल्गुण वद्य तृतीया बुधवार ते दिवसी त्रिंबक विश्वनाथ यासि रखमाजी बापुजी व बाबाजी बापुजी व शिवाजी बापुजी व गोमाजी बापुजी लेहोन दिल्हे ऐसे जे मौजे मानवरीच्या कुळकर्णाचे भांडण रामाजी गावखंडेराव यासि लागले होते दिव्य केले खरे जाला तो वाद सागता पैके पडिले त्याणी तक्षीम आपणास द्यावयासी नाही पैकियाचे व्याज वाढेल आणि दोही गावास लिगाड लागेल ह्मणऊन सोनवरीचे कुलकर्ण व जोतीश पैकियाकरिता तुह्मास आपले खुषीने लेहोन दिल्हे यासि अर्थाअर्थी समध नाही एणेप्रमाणे असलपत्र

                                                    गोही

बहादुरखान वलद हबूबखान                                     मोकदम मौजे दिये
सिक्का                                                                निशाणी नांगर
सूद                                                                     मल वरटा
माव मेहतर                                                          जाव सुतार                                                        
बहिर परणा                                                          एस माळी
लखम साळवी                                                       मोतादिक माहार

एणेप्रमाणे निकालपत्र लेहोन दिल्हे त्यास साठी पासेष्ट वरषे होत आली तुमच्या वडिलाच्या लिहिल्याप्रमाणे आह्मी निमे वृत्ति पांचजण भाऊ अनभवीत आलो तुह्मी मागती आह्मासी उपद्वाप केला की माझे वडिली लेहोन दिल्हे परतु नातवान होते तुह्मी कुटुबपोषक होता हालीं आपला खर्च पडिला असेल तो व्याजसुध्दा घेऊन माझी वृत्ति मोकळी करणे ह्मणऊन प्रसग तुह्मी जगजीवन शामराज व बनाजी मोरेश्वर व रामचद्र गोविंद व खडो सिवदेव व गोविंद गोपाळ यासि केला एक दोनी सवाद मौजे दिये का। सासवड एथील पारीं जाले त्यावरी एकदोनीदा प्रसग मौजे वाघोली ता। हवेली प्रा। पुणे एथील पारी राजश्री पिलाजी जाधव मोकदम मौजे मजकूर याजपासी जाला परतु हा कजिया परिछिन्न वादे कोण्ही निवडिला नाही त्यावरी तुह्मी मौजे दिये का। सासवड एथील पारी बलात्कारे बनाजी मोरेश्वर यापासून कोण्ही भाऊ हजीर नसतां कळेल ते रीतीनें लेहोन घेतले त्याणी प्रसग पाहून लेहून दिल्हे लिहिले आत्मसतोषाचे नव्हे वरकड भाऊबद शब्द ठेवितील ऐसे जाणोन बनाजी मोश्वर याणे बिकलम जलम ऐसे सेवटी लेहोन कागदपारावरी यादव माळी पुणेकर व समस्त लोक याजपुढे ठेऊन घरास आला तोचगाव सोडून खडो सिवदेव याजकडे मौजे करदी प्रा। नेवासे एथे वर्तमान सागावयास आला तेथे वर्तमान सागितले राजश्री सभाजी जाधव दियात बसोन आपणास नेऊन रजावद नसता लेहून घेतलें मग आपण बिकलम जूलूम ह्मणून दहशत खाऊन गैरहजीर होऊन तुमचे भेटीस आलो त्यास पत्र दिक्कतीचे ह्मणून तुह्मी सभाजी माणकेश्वर यावरी कर्जाचे पेच ठेऊन त्याचे हातीचे दुसरे पत्र करून घेतले. आणिक्ष कुलकर्ण करावे तो रामचद्र गोविंद व गोविंद गोपाळ हे हकमाकडे किल्ले पुरधरास राजश्री बापुजी श्रीपत याजवळ जाऊन उभे राहिले आणि हकीकत सागितली की आपल्या वडिलास निंबाजीपताच्या वडिलीं खुसीने सोनोरीचे कुलकर्ण जोतीश तक्षीम लेहोन दिल्हे त्यास साठी पासेष्ट वरसे जालीं असता पत्रप्रमाणे आह्मी खात असता हाली निंबाजी याणी कज्या करून आपला भाऊ बनाजी मोरेश्वर व सभाजी माणकेश्वर या पासोन जैसे मनास मानेल तैसे लेहून घेतले दियामध्ये राजश्री सभाजी जाधव याची मालुमात करून पत्र लेहून घेतले आपणावरी जुलूम जाला तर आपला इनसाफ करावा मग राजश्री बापुजीपत बोलिले की इनसाफ पेस्तर करून तोवर असणे मग राजश्री बापुजीपतानीं सोनोरीकर पाटिलास चिठी पाठविली की सोनोरीचे भाडण निंबाजीचे व रामचंद्र गोविंद याचे पडिले त्यास इनसाफ पेस्तर होईल तोवरी कुलकर्ण-जोति-साचे काम तुह्मी चालवणे ऐसी खटपट रामचद्र गोविंद व गोविंद गोपाळ याणी करून तुमचा इतल्ला कुलकर्ण व जोतिसात होऊ दिल्हा नाही त्यावरी बनाजी मोरेश्वर व जगजीवन सामराज व भगवत सामराज व रामचद्र गोविंद हे ती ची वरषात एकामाघे एक मृत्यु पावले खडो शिवदेव व लक्ष्मण माणकेश्वर हे कसालियामुळे पोट भरावयासी गगथडीकडे नेवासेप्राते गेले सोनोरीस गोविंद गोपाळ व जगजीवनपताची मुले धाकटी राहिली त्यावरी कज्या मोघम राहिला याजवरी खडो सिवदेव व लक्ष्मण माणकेश्वर देशास आले देसी येऊन मूळ वृत्ती भुतोपताची पाच गाऊ नीरथडीचे दोनी पिढिया बापभाऊ खात होते तेथे आले तेथे जिवाजी साबाजी व माहादाजी चितामण व खडो नागनाथ व कान्हो केशव यासि वाद पडिला मग सातारा एऊन राजश्री नारो शकर पतसचिव जिल्हेदार यासी भेटून महादाजी चितामण हुजूर आणविला पचाइतीस स्थळ मौजे चादक समत हवेली प्रा। वाई हे थळ मागोन घेतले वाद फार सागितला ते प्रसगी माहादाजी चितामण वदला की पूर्वी परभुणियाचा वाद आपले वडिली सागितला शिरवळी दिव्य आपले वडिली केले त्याबद्दल खर्च जाला तो व्याजसुध्दा देणे व आजीपर्यत वतनामुळे पडझड पडली तो हिशेब वारणे त्याप्रमाणे गोताने आज्ञा केली की हे वारावे आणि आपली तक्षीम खावी