मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५११

श्री.
१७२२ मार्गशीर्ष वद्य ७

श्रीमंत महाराज राजश्री नानाजी स्वामींचे सेवेसीः-

विद्यार्थी परसरामभट धर्माधिकारी व मल्हार रामचंद्र कुळकर्णी सां। नमस्कार विनंती विज्ञापना ता। मार्गश्वर वद्य ७ पावेतों यथास्थित असों. विशेष. अलीकडे गांवचें वर्तमान यथास्थित आहे. काल रा. आपाभट गोखले पुण्याहून आले. त्यांनी वर्तमान सांगितले. श्रीमंत पुण्याहून निघून सासवडचे मुकामीं गेले. तेथून यशोदाबाई व नानाफडणीसाची बायको व उभयतांचीं कुटुंबे व प्रतिनिधी यास पुरंदरी ठेऊन, श्रीमंत मागती सासवडचे मुकामीं आले. तेथें सखाराम घाडगे यांणीं कही खेड्यावर पाठविली. तेथें गरीवगुर. बांचे पांघुरणे वगैरे भांडे नेली. तें वर्तमान श्रीमंतास कळलें. त्यावरून घाडगे यांस बोलाऊन आणलें. सांगितलें की, हें काय ? घाडगे याचें म्हणणें कीं, मला पुसून गेली नाहीं. मग श्रीमंताचे ह्मणणें पडलें कीं, हा कांहीं पुण्याचा मुकाम नाहीं, सासवडची मुकाम आहे. अशा लबाड्या कराल तर कामास येणार नाहीं. तुझें समागमें यावयाचें काम नाहीं. तेच क्षणीं घाडगे मार यास पुण्याकडे काहाडून दिल्हें. होळकराचा मूल घाडगे याचे स्वाधीन करावा, म्हणोन घाडग्यास समागमें नेलें होतें. शेवटी मूलहि न देतां, यारीतीनें काहाडून दिल्हा. पुण्यांतील लोक तमाम बाहेर जात होते, हें वर्तमान श्रीमंतास कळलें. त्यावरून बाळोजी कुंजर याकडे पुण्याबाहेर चवकीचें काम सांगितलें. त्यावरून भोंवत्या चवक्या बसल्या आहेत. पुण्यांतून माणूस चवकशीवेगळे बाहेर निघूं देत नाहीं. तमाम भाडेकरी यांच्या घरीं चवक्या बसविल्या आहेत. याप्रों वर्तमान आहे. मोत्याजी गावडे यांणी तिरस्तलीपासून ब्राह्मणांची बेआब करून पैका घेतला, हें वर्तमान शास्त्रीबावानीं श्रीमंतास समजावलें. त्यावरून श्रीमंताचे झणणें कीं, काय करूं, माझा कांहीं उपाय चालत नाही. ज्या उद्देशं बाहेर निघालों, तें कार्य झाल्यास सर्व दुष्टांचे पार. पत्य होईल. प्रतिनिधीचे मुलकावर घाडगे यांची जप्ती होती. तेव्हां श्रीमंतांनी प्रतिनिधीस आज्ञा केली कीं, त्याची जप्ती उठऊन तुह्मी आपला अमल बसवा. ते जबरीस आले, तेव्हां प्रतिनिधीकडील जोर पोंहोचला. प्रतिनिधीचे शिबंदीने घाडगे यांचे शेंदोनसें दोन लोक धरून, नाक कान घेऊन पुण्याकडे रवाना केले. बाळशास्त्रीचे कुटुंब व खेडरुषांचे कुटुंब पुरंदरास गेलें. काशीराव होळकरास तीन लक्ष रुपये देऊन आज्ञा केली कीं, फौज ठेऊन सत्वर सासवडचे मुकामीं बोलाविलें आहे. शिंद्याचें कुटुंब जामगांवास आलें. गोपाळरायाचा मुकाम पंधरा दिवस जामगांवींच आहे. गावड्याचें लष्कर निबरीपाचेगांवकडे गेलें. आपण गेलेत ते दिवशीं बरेंच निभाऊन गेलेत. दुसरे दिवशीं भेडाळ्याकडून तेरा स्वार आलें. त्यांनी दौलताबादकर वाणी इकडे येत होता, त्यांस भेडाळे याचे+++जवळ वाणी यांस लुटलें. त्याजपाशीं दोनशें रुपये रोख होते व पांघुरणे व आणिकही लोकांची पांघुरणें घेऊन नीट कळंबीनें अंमळनेराकडे गेले. शिवाजी पा याचे मळ्यापासून मागती आपले गांवाकडे आले. ते सरकारचे मळ्याखालून गगेंत उतरले. गंगेत घोडयास पाणी पाजून आस्तान पाणोथावर चहडले, तो मारवाडी बोंबलीत आला. त्यावरून आह्मी पांच पन्नास माणसें घेऊन मागें गेलों. तों ते निघून गेले. पुढें प्रवरासंगमापुढें चिंचा आहेत. तिकडून आपाभट गोखले व टोंकेकर दोघे ब्राह्मण येत होते. त्यांसहि लुटलें. टोंकेकराचे दोंचारशांचें वित्त गेलें. आपाभटाचे पन्नासा रुपयांचें वित्त गेलें. मग ते स्वार गोधेगावावरून सायंकाळीं जामगांवीं आले. तेथें वाटसोर लुटलें. त्यांजपाशीं दोहजाराचें वित्त होतें, त्या प्रमाणें त्या तेरा स्वारांनीं गर्दी केली. प्रस्तुत आंधारी रात्र आली आहे. भोंवतालचे खेडे उज्याड आहेत. महारामांगाच्या हाट्या जमल्या आहेत. त्यास, गांवांत गस्त फिरली पाहिजे. तरुत महिना पंधरा दिवस दोघे मुसलमान प्यादे ठेवावें. दिवसा वेशीजवळ राहून रात्रीं गस्त देत जातील. आपली आज्ञा होईल, त्याप्रमाणें करूं, राजश्री बाळाजी यशवंत काल गांडापुरास गेले. तूर्त लोकास कऊल देतात. मग पुढें मागती प्रथम दिवस आहेच. पेंढारी यांची आवई उठली होती. परंतु ते गलत वर्तमान. ते तूर्त लांब आहे. लखामापूरची यात्रा तूर्त राहिली. श्रीनिवास गोसावी वारले. त्यांची स्त्री सती गेली. वरकड वर्तमान सर्व यथास्थित असे. आपलेकडील सविस्तर वर्तमान लिहावयास आज्ञा जाहली पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries