मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५०७

श्री
१७२२ मार्गशीर्ष शुद्ध १५सिद्धेश्वर

राजश्री मोत्याजी कालगावडे गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो बाजीराव रघुनाथ प्रधान आसीर्वाद सु। इहिदे मयातैन व अलफ. क्षेत्र टोंकें प्रवरासंगम कायेगांव या क्षेत्रीं तुझीं ब्राह्मणास उपद्रव देऊन बेअब्रू करून खंडणीचा ठराव केला. त्यांत ब्राहाणापासून ऐवज घेऊन बाकीचे ऐवजास श्री देवाचे डागिने घेतले आहेत म्हणोन हुजूर विदित जालं. त्याजवरून सरकारांतून खिजमतगार आ २ पाटऊन हें पत्र सादर केलें असे. तर टोंके वगैरे येथील क्षेत्राचे ब्राह्मणापासून ऐवज व देवाचे डागिने घेतले असतील ते खिजमतगार यांचे गुजारतीनें माघारी देऊन पुढें तीही क्षेत्रींचे ब्राह्मणास व रयतीस उपद्रव न करणें. येविपई फिरोन बोभाट येऊं न देणें, जाणिजें, छ, १३ रजब. अशा प्रमाण, मोर्तब शिका.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries