मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५०५

श्री.
१७२२ मार्गशीर्ष शुद्ध ८

आसीर्वाद उपरी येथील वर्तमान मार्गशीर्ष शुद्ध ८ इंदुवार पावेतों यथा.

स्थित असे विशेष. येथील वर्तमान तरीः मोत्याजी कालगावडा याची फौज आठ दाहा हजार पावेतों आली. टोकेंकरास खंडणीचे चार हजार रुपये पडले. शिवाय ++ आठसें रुा प्रवरासंगम येथील साडे सातसें कायेगांवचे ऐन तीन हजार सिवाय दरबार खर्चाचे रुा पांचसे सिवाय ताकीदार वगैरे मिळोन दोनसें रुापर्यंत खर्च लागले. यासी पट्टी सर्वं ग्रामस्त सरकारसुद्धां साडे तीन हजार पर्यंत केली आहे. त्यांत मराठे व भिडे व थथे व नरसिंह जोशी वे ऋषी यांचे खंड मात्र आहेत. तूर्त ऐवज येत नाहीं. बाकी कमकसर पट्टी वसूल येईल. ठरावांत भरणा होत आहे. लष्कराचा मुकाम आठ दिवस आहे, ह्मणून बोलवा आहे. चिरंजीव राजश्री हरभटदादा येथें आले होते. त्यांचे भेटीस बापू अमृतराव व गोपाळपंत असे आले होते. रवानगीविशीं कांहीं ह्मणत होते. परंतु गडबडीमुळें कांहीं सोय न जाली. दादा पंचमीस पैठणास गेले. बापूसुद्धां मंडळी नांदगांवीं गेली. गडबडी ++ चिरंजीव सो मैनास व मुलीस * साता-यास पाठविल्या. समागमें कापड व कांहीं दप्तरें अशी पाठविलीं. मी पंचमीस जाणार. परंतु गडबडीमुळें जाणें ने जालें. वरकड आह्मीं सावध आहों, टोकेंकर कांहीं ग्रहस्थ स्थलांतरास गेले ! कळावें. बहुत काय लिहिणें, हे आशीर्वाद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries