Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

१ नबाबाजवळ गोविंदराव काळे यांचे बोलणें केलें कीं नाशरिनमुलुख यास सुचना जाऊन त्याणीं आमचे लक्षाप्रमाणें चालावें, व आमचें राजकारणास अनुकूळ असावें. बाजीरावसाहेव राज्यावर आले ह्मणजे खर्ड्याचे स्वारीस जो मुलुख घेतला आहे तो परत देऊं व ऐवज येणें ठरला आहे तो सोडून देऊं, असें ठरल्यावरून ते नानाचे राजकारणास अनुकूळ होऊन नाशरिनमुलुख यांस नानाचे लक्षानें चालण्याविशीं सूचना केली; त्याजवरून नाशरीन यांणीं परशरामभाऊ यास द्यावयाकरितां ऐवज परड्यास आणविल होता तो परड्यास तसाच ठेविला; दिल्हा नाहीं.

१ बाबा फडके यांजकडे ऐवज पाठऊन हुजरातचे फौजेस खर्चास आंतून देऊन फौज त्याणीं आपले लक्षांत लाऊन घेतली.

१ बाजीरावसाहेब शिंद्याचे लस्करांत होते, त्यास ऐवज खर्चास पाठविला. त्यांचे लक्ष आपल्याकडे होतें ते दृढ करून घेतलें. बाजीरावसाहेब यांणीं आपले बंडांत दोन तीनशें लोक जमा केला.

१ मानाजी फाकडे बाजीरावसाहेब यांचेजवळ शिंदे यांचे लष्करांत होते, त्यांस खर्चास पाठविलें. त्यांणीं कांहीं लोक आपले जवळ जमा केले.

१ शिंदे यांणीं पागनीस यांस कैद करावें, व बाबा फडके यांणीं परशरामभाऊ यांस कैद करावें असा संकेत होऊन श्रावण वद्य ८ छ, २२ सफरी शिंद्याची फौज तयार जाली व फडके यांजवळ हुन्नजरातची फौज तयार होऊन आली, इतकि यांत पागनीस सावध होऊन त्यांणीं आपले लष्करचा बंदोबस्त केला व परशरामभाऊ हुशार जाले. त्याजवरून फडके यांची फौज माघारी गेली. नंतर परशरामभाऊ यांणीं फौज व पागेचे सरदार यांस गोडी व जरब देऊन फोडाफोड केली आणि बाबा फडके यांस भाद्रपद वद्य १२ बुधवार छ. २५ रबीलावली कैद करून चाकेण किल्ल्यांत पाठविलें; घराची जप्ती केली; नारोपंत चक्रदेव पळोन गेले; ते मशरीन याचे लष्करांत जाऊन काठीकर, शिलेदार यांचें गटांत राहिले. मालाजी घोरपडे व निळकंठराव परभु, परशरामभाऊ यांचे लक्षांत आले नाहींत सबब त्यांचें घराचे आसपास चौक्या ठेऊन धरावयाची मसलत केली परंतु ते आपले मजबुदीनें राहिले; आणि फौजसुद्धां निघोन वाई प्रांतीं गेले.