मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण व. ३ शनिवार शके १७१५.

विनंति. उपरि, औरंगाबादेवर ऐवजाच्या तनखा घेतल्या तो यैवज कांहीं आला, कांहीं नाहीं, येविषयीं दफ्तरची याद पाठवावी ह्मणोन आज्ञा आली. त्यावरून पेशजी याद पा; व हल्लीं याद दप्परची घेऊन पा आहे. बाकी येणें फार. निकड होऊन जगधनावर चिठ्या घ्याव्या ह्मणोन लिं, त्यास पेशजीच्या यादीवरून येथें रसीदांसी रुजुवात पाहतां कांही मिळेना. येथें रसिदांच्या रुजुवातानें ऐवज बाकी येणें निघाला, त्यापैकीं येक लाख यांचे कर्जात देऊन बाकीची चिठी जगधनावर घेऊन पशजी पाठविली. व रसिदांच्या नकला वगैरे या प्रकर्णी ता पेशजीं लिहिल्यावरून समजलाच असेल. त्याप्रा दफ्तरीं रुजुवात पाहून चिठीप्रा ऐवज आणावयास कारकून तिकडे रवाना करावा. कांहीं लड़ा ऐवजाचा रसिदांपैकीं असल्यास लेहून पाठवावें, रा। छ १६ मोहरम हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries