मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ व. १० बुधवार शके १७१५.

विनंति उपरि घासीमीयां व सरबुलंदजंगा बाबत न हप्त्याचा ऐवज येणें दोन हप्त तरि जगधनाकडे पावले असावे ऐवजाची व्यवस्था कसी ? आज्ञा यावी ह्मणोन ता लिहिलेंल्यास उभयतांकडील ऐवज महमद अजीमखां यांचे मारफातीनें आला त्याचे झाड्याची याद आलाहिदा ता। वार लिहिल्यावरून कळेल. सरबुलंद जंगाकडील ऐवजाचा फडच्या जाला थोडी बाकी येणें राहिली. घासीमीयांकडे भरणा भारी कारमार वोडग्रस्त, आरंभापासोन खांसाहेबास निकड करण्यांत गुंता नाहीं परंतु आजपर्यंत ऐवजाची सरबराई जाली नाहीं, तीमाराव व गोविंदराव पालीमलार दोन आमीलाकडून वसूल ती-याणव हजार पांचशें पावला. कांहीं माहुली मामलेदाराकडे फडच्या होऊन रसीदाही आल्या. त्या रुजु करण्याकरितां चिमणलाल आला होता. सांप्रत तिमात्र ही आले. खां साहेबास निकड लाविली आहे. पांच सात दिवसांत हिसेब रुजू होऊन बाकीचा फडच्या कसा करून देतात हें समजोन लिहिण्यांत येईल. रा। छ २३ जिल्काद हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries