[१८०]                                                                               श्री.                                                                  २४ सप्टेंबर १७९५.                                 
विनंति विज्ञापना. छ ८ रविलावल मंगळवार रात्रीं नबाबाकडे दरबारास गेलों. मीरअलम व राजाजी व रघोत्तमराव होते. नबाबाकडील पत्राचा जाब सरकारचे करितां पत्र मझेल्याचें सलाहविषयींचें उत्तर राजश्री नाना यांजकडील पत्रासहीत प्रविष्ट केलें. नबाबांनीं पत्रें वाचून पाहिल्यानंतर सरकारचें आज्ञापत्र माझें नांवें आलें, तेंही वाचून दाखविलें. सरकारी पत्राचे जबाब मागितले. उत्तर जालें कीं, उदईक जबाब लिहिण्याचें ठरावांत आणून तयार करवून देतों, व तुह्मांसही लिहावयाचे मरातब बोलण्यांत येतील त्याप्रमाणें तुह्मीं लिहावें. त्यास आज उद्यां सरकारी खरित्याचा जबाब नवाबांनीं दिल्हा ह्मणजे बोलण्यांत येईल त्याअन्वयें विनंति पत्रासहित रवानगी करीन. अलिज्याह यांचीं पत्रें सरकारांत आलीं, त्याप्रकर्णी नबाबास खरिता आला तोही पावला. नबाबास देऊन जाब घेऊन पाठवितों. र।। छ १० र।।वल. हे विज्ञापना.