Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २९८
१७२१ भाद्रपद वा। १३ बाळबोध

।। श्रीकृष्ण॥

बजभट्ट बिन मनभट्ट व बापा श्रीधर यानी क्षेत्रास येउन विदित केले जे रगभट्ट बिन दादभट्ट याची स्त्री निवर्तली तीचे आशौच अह्मी धरिले नसता अमचे अर्धलीचे भाउ यानी धरीले ह्यणोन त्यास आणोन चौकशी करावी त्याज वरून बाळाजी मुकुद प्रभृति त्याचे भाउ क्षेत्रास आणोन विचारिले जे बाबा श्रीधर व त्याचे अर्धलीचे घरबधु याणी आशौच धरले नसता तुह्मी अशौच धरले त्याचे कारण काय त्याज वरून त्यानि उत्तर केले जे पूर्वी पासोन अशौच धरीत अलो व हल्लि वहिवट ही आशौच धरावयाची चालत आहे ह्मणोन अम्ही व बाबा श्रीधर याचे घरभाउ गोविंदभट्ट अरे व अनतभट्ट अरे यानी आशौच धरिले व बाळाजी शामजी याज पाशी आदिमाळिका होती ती बाबा श्रीधर याज पाशी देऊन आठ दहा वर्षे जाहलि असता बाबा श्रीधर प्राभृति समस्त आशौच आजपर्यत धरीत आले ह्मणोन अह्मी धरिले हल्लि बाळाजी शामजी याणि आदिमाळिकेची याद खोटी ह्मणोन अपले भावाबदाचा साक्षी घालून पत्र लिहून दिल्हे त्याज वरून बाबा श्रीधर यासी विचारिले जे तुह्मी रगभट्ट बिन दादभट्ट योच वृद्धिक्षय वडिला पासोन आजपर्यंत धरिले व हल्लि सोडिले या दोहिचे कारण काय ते लेहून देणे त्याचे उत्तर न करीता व निष्कृति न करीता क्षेत्रा हून निघोन गावास गेले तर मा।रनिल्ले क्षेत्रास येऊन कृतकर्माचि निष्कृति करीत तो पर्यत त्याचे भाउ जितक्यानी सूतक धरिले नाही त्याचे येकपक्ति अन्नोदकव्यवहार न करणे व भोवर गावास हि या प्रमाणे सागणे शके १७२१ भाद्रपद वा। १३ बहुत काय लिहिणे हे नमस्कार

वेदमूर्ति राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण व राजकीय ग्रहस्तसमुदाय वास्तव्य नरसिपुर यास श्रीमतक-हाटकक्षेत्रस्थ समस्त ब्राह्मण कृतानेक नमस्कार व आसीर्वाद उपरी