मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६२४

श्री.
१७२४ पौष वद्य ७

दस्तक सरकार राजश्री पंत प्रधान ता। कमावीसदारान व चौकीदारान व रहदारान व बाजेलोकान व मोकदमानी देहाय. सुा। सलास मयातैन व अलफ, राजश्री खंडो मुकुंद सरकारांतून बडोद्यांस जात आहेत. बराबर घोडीं रास सात व म्याना एक व माणसें असामी च्याळीस असेत. तरी मार्गी कोणेविशीं मुजाहीम न होतां जाऊ देणें. ज्या गांवीं वस्तीस राहतील, तेथें चौकी पाहारा करून आपलाली हद्दपार करणें. जाणिजे, छ १९ रजब. आज्ञाप्रमाण.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries