मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १८४.

श्री.
१६९९ पौष शुद्ध २.

रा छ ३० जिल्काद, सन समान XXX जंजीरेकर हबशी यांचें पत्र. आंमरतपन्हांनी मुफाविना इबलाग केला तो उसूल होऊन खुरमी हांसल जाहाली. कितेक मजमून बयावार कलमीं केलें, ते आंयां जाले. लेकिन ये बाबेचे मजमून मुफसल गणेशराम दातार यांस हुकूम करून रा केलें असतां, रहादरायान त्यास लासूर पैदा होऊन घांटमाथां छ जिल्कादीं फोत जाले. बिनाबरा, दुतर्फा कित्तेक मुकदमेंयांचा फैसला होणें, सबब मोहिबांकडून वाकफगार शाहाणें माणूस रा करावें, समजोन घेऊन जाबसाल करून रा केले जातील. सरकार तर्फेनेंही शाहाणें माणूस रुखसत होतील. बिलफैल, प्रांतांत दंगा होऊन रयतीस उपसर्ग होतो, ये बाबेचे हूजूर बोभाट येतात. हें एखलासीचे जागां मुनासीब नाहीं. ताकीद करून उपसर्ग प्रांतांत न होय तें.........कीजे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries