Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लट् व लङ् या दोन लकारांच्या परस्मैपदी व आत्मनेपदी प्रथम पुरुषाच्या एकवचनाच्या साधनिकेत त्, अ व इ ही तीन सर्वनामे येतात. नुसता त् परोक्ष म्हणजे भूतकालीन परस्मायक क्रिया दाखवितो; अ कर्त्याचे खास स्वतस्त्व दाखवितो आणि इ क्रियेचे वर्तमानकालीनत्व ऊर्फ सन्निकृष्टत्व दाखविते.

आतां लोट् मध्ये काय प्रकार आहे ते पाहू. अत्तु हे अद् धातूचे परस्मायक रूप आहे व कष्टाम् हे कश् धातूचे आत्मनायक रूप आहे. अद् त् उ व कश् त् अ अम् अशी प्राथमिक पूर्ववैदिक भाषेत वाक्ये होती. अद् त् उ या वाक्यात त् पारीक्ष्यदर्शक आहे व उ किंचित् विप्रकर्षदर्शक आहे. अद् त् उ म्हणजे तो (त्) तो (उ) खावो. कश् + त् + अ + अम् या वाक्याचा अम् म्हणजे हा, अ म्हणजे खास हा व त् म्हणजे तो, मिळून तो खास हा स्वत: जावो (कश्), असा अर्थ आहे. अत्त या रूपात त् व उ दोन्ही विप्रकर्षदर्शक आहेत, परंतु कष्टाम् या रूपात अम् सन्निकर्षदर्शक असून शिवाय अ हे खासपणा ऊर्फ स्वतस्त्व दाखविणारे सर्वनाम जास्त आहे. सबब अत्तु हे परस्मैपदी व कष्टाम् हे आत्मनेपदी रूप समजले जाते. लट् व लङ् प्रमाणेच लोट् मध्येही अ सर्वनाम आत्मनायकत्व दाखविते. आता वैदिक लेट् मधील प्रथम पुरुषाच्या एकवचनाचे पृथक्करण आधी करू

या दुहेरी सर्वनामांना पुन: अ, इ, वगैरे सर्वनामे पुढे किंवा मागे लागून अनेक तिहेरी सर्वनामे होत, पैकी काही येणेप्रमाणे :

त + अत् = तत् (परोक्षपदार्थदर्शक)
ए + तत् = एतत् (अत्यंत सामीप्यदर्शक)
अत् + अस् = अदस् (विप्रकर्षदर्शक )
इत् + अम् = इदम् (सामीप्यदर्शक)

नुसता त् अत्यंत परोक्षपदार्थदर्शक आहे. तत् मध्ये सामीप्यदर्शक अ असल्यामुळे ते त् हून कमी परोक्षत्व दाखविते. अदस् मध्ये अत् व अस् ही दोन्ही सर्वनामे विप्रकर्षदर्शक असल्यामुळे, ते तत् च्या जवळजवळचे परोक्षत्व दाखविते. इत् व अम् ही दोन्ही कमी विप्रकर्ष दाखविणारी असल्याने इदम् सामीप्यदर्शन करते आणि एतत् मध्ये अ व इ हे दोन्ही प्रचुर सामीप्य दाखविणारे असल्याकारणाने ते समीपतरभाव दर्शविते. तात्पर्य, अ व इ ही दोन्ही सर्वनामे सामीप्य दाखविणारी आहेत. दोहोत फरक एवढाच की अ हून कमी सन्निकृष्ट पदार्थ दाखविणारे इ सर्वनाम आहे आणि अत्यंत सन्निकर्ष दाखविणारे म्हणजे बोलणाऱ्याचे अत्यंत तादात्म्य दाखविणारे सर्वनाम अ हे आहे. अ च्या मानाने इ दूरचा पदार्थ दाखविते. सबब अत्ति, या रूपात परभाव जास्त दिसतो आणि कष्टे या रूपात आत्मभाव जास्त दिसतो. परभाव जास्त दिसतो म्हणून अत्ति या रूपाला परस्मैपदी रूप म्हणतात व आत्मभाव जास्त दिसतो म्हणून कष्टे या रूपाला आत्मनेपदी म्हणतात. अ हा अत्यंत सामीप्य दर्शक ऊर्फ अत्यंत तादात्म्यदर्शक स्वर उच्चारून वक्ता कर्मकर्तृत्वाचा स्वत:चा खासपणा दाखवितो. तात्पर्य, अ या स्वराचा ऊर्फ शब्दाचा ऊर्फ सर्वनामाचा अर्थ खास स्वत: असा आहे.

आता इ या सर्वनामाचा अर्थ काय ते पाहू. अत्ति या रूपात त् सर्वनामापुढे इ सर्वनाम लागले आहे. असे एक धातुरूप घेऊ की ज्यात त् या सर्वनामापुढे इ हे सर्वनाम येत नाही. हन् (हन्त्) हे वैदिक लङ्च्या प्रथम पुरुषाच्या एकवचनाचे रूप आहे. त् च्या पुढे इ नाही. इ नसल्यामुळे त् हे सर्वनाम फक्त परोक्ष क्रियापदार्थ दाखविते. हन्ति या रूपात त् च्यापुढे इ असल्यामुळे ति हे जोड सर्वनाम प्रत्यक्ष क्रियापदार्थ दाखविते. हन्ति या रूपात त् च्यापुढे इ असल्यामुळे ति हे जोड सर्वनाम प्रत्यक्ष क्रियापदार्थ दाखविते. प्रत्यक्ष म्हणजे वर्तमानकालीन आणि परोक्ष म्हणजे भूतकालीन. हन् (त्) हे भूतकाळाचे रूप का व हन्ति हे वर्तमानकाळाचे रूप का त्याचा हा असा उलगडा आहे. इ हे सर्वनाम कर्मकर्त्याचे प्रात्यक्ष दाखविणारे आहे. हन् (त्) हे परस्मैपदी रूप आहे. आत्मनेपदी रूपातही हाच प्रकार आढळतो. वस्ते या रूपात त् + अ+ इ अशी तीन सर्वनामे आहेत, व अवस्त या रूपात त् + अ अशी दोनच सर्वनामे आहेत, इ सर्वनाम नाही. प्रत्यक्षता म्हणजे वर्तमानकालत्व दाखविणारे इ हे सर्वनाम असल्यामुळे वस्ते हे रूप वर्तमानकालाचे समजत व नसल्यामुळे अवस्त हे रूप भूतकालाचे समजत. सिद्ध झाले की इ हे सर्वनाम प्रत्यक्षता ऊर्फ सन्निकर्ष दाखविणारे आहे. अ हे सर्वनाम कर्त्याचे स्वतस्त्व दाखविते व इ हे सर्वनाम क्रियेचे वर्तमानकालीनत्व ऊर्फ प्रत्यक्षत्व दाखविते.

पैकी त् व स् हीं सर्वनामे एकार्थक असून एकमेकांच्या बदली योजिली जात. कारण प्राथमिक भाषेंत त् व स् यांचे उच्चार बहुतेक सारखे असत. या आठ दुहेरी सर्वनामांना पुढे मागे अ वगैरे सर्वनामे जोडून काही तिहेरी सर्वनामे बनत :

अस् + अ = अस
अम् + अ = अम
इम् + अ =इम
अन् + अ= अन
त् + अत् = तत्
अम् + उ=अमु
अत् + अस् = अदस्
ए + त = एत
इत् + अम् = इदम्
ए + अम् = अयम्
ए + न् + अ = एन
ए + अ= अय
ए + तत् = एतत्

इदम् सर्वनाम सन्निकृष्ट अर्थ दाखविते. त्याहून अलीकडला ऊर्फ सन्निकृष्ट तर ऊर्फ समीपतर अर्थ एदत् सर्वनाम दाखविते. तत् सर्वनाम परोक्ष म्हणजे डोळ्यापलीकडील गैरहजर पदार्थ दाखविते आणि अदस् सर्वनाम परोक्ष ऊर्फ डोळ्यापलीकडील पदार्थाहून अलीकडला म्हणजे डोळ्याच्या टप्प्याच्या आतील परंतु दूरचा हजर पदार्थ दाखविते. एतद् अत्यंत समीप पदार्थ दाखविते. इदम् त्याहून कमी समीप म्हणजे (किंचित् दूरचा पदार्थ दाखविते. अदस् अत्यंत दूरचा पदार्थ दाखविते आणि तत् गैरहजर पदार्थ दाखविते. सन्निकर्ष विप्रकर्ष दाखविणारे हे अर्थ या चार सर्वनाम शब्दांना आले कसे ते पहाण्यासारखे आहे. मूळ प्राथमिक पूर्ववैदिक भाषेत अ, इ, उ, ऋ, त्, स्, न्, म् अशी आठ दर्शक सर्वनामे असत. पैकी अ अत्यंत सन्निकृष्ट पदार्थ दाखवी. इ त्याहून कमी सन्निकृष्ट पदार्थ दाखवी. म् व न् इ हून कमी सन्निकृष्ट पदार्थ दाखवीत. उ किंचित् विप्रकृष्ट पदार्थ दाखवी. ऋ त्याहून विप्रकृष्ट पदार्थ दाखवी आणि त् व स् अत्यंत विप्रकृष्ट म्हणजे परोक्ष पदार्थ दाखवीत. या एकाक्षरी सर्वनामांचे अनेक जोड होत. पैकी काही येणेप्रमाणें: ह्न

अ + अ = या (अत्यंतात्यन्त सामीप्यदर्शक)
अ + इ = ए (अत्यंतात्यन्त सामीप्यदर्शक )
अ + त् = अत् (परोक्षाहून कमी विप्रकर्षदर्शक )
अ + स् = अस् (परोक्षाहून कमी विप्रकर्षदर्शक )
अ + म् = अम् (परोक्षाहून अत्यंत कमी विप्रकर्षदर्शक म्हणजे बरेच सन्निकृष्ट )
अ + न् = अन् (परोक्षाहून अत्यंत कमी विप्रकर्षदर्शक )
इ + त् = इत् (परोक्षाहून कमी विप्रकर्षदर्शक )
इ + न् = इन् (परोक्षाहून अत्यंत कमी विप्रकर्षदर्शक )
इ + म् = इम् (परोक्षाहून अत्यंत कमी विप्रकर्षदर्शक )
इ + इ = ई (सामीप्यदर्शक)
उ + स् = उस् (अत्यंत विप्रकर्षदर्शक )
उ + ऋ = उर् (अत्यंत विप्रकर्षदर्शक )
त् + अ = त (आत्मनायकत्वदर्शक)
त् + इ = ति (वर्तमानकालदर्शक)
त् + उ = तु (विप्रकर्षदर्शक)

२ संस्कृत व वैदिक भाषात धातूंच्या पुढे जे प्रत्यय येतात ते मुळात सर्वनामे आहेत ही बाब सर्वमान्य आहे. तत्रापि ती सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत या बाबीचा उलगडा अद्याप कोणी केलेला नाही. हा उलगडा आरंभितांना सर्व लकारांतील तिन्ही पुरुषी जे प्रत्यय येतात त्यांचे पृथक्करण करणे अवश्य होते. करता प्रथम पुरुषापासून पृथक्करणाला आरंभ करतो. परस्मैपदी रूपात लट्च्या प्रथमपुरुषी एकवचनात जसे ति हे सर्वनाम येते, तसे आत्मनेपदी रूपात ते हे सर्वनाम येते. ति व ते या दोन सर्वनामांपैकी ते चा अर्थ तो स्वत: खास असा आहे व तिचा अर्थ तो दुसऱ्याकरता असा आहे. ते या सर्वनामात स्वत: ति या सर्वनामात दुसऱ्याकरता हे अर्थ कोठून आले? ति व ते या सर्वनामात त् हे अक्षर सामान्य आहे. त्यात स्वत: किंवा दुसऱ्याकरिता हे दोन अर्थ असणे संभवत नाही. तेव्हा इ व ए या दोन स्वरात हे भिन्न अर्थ असणार हे उघड आहे. स्पष्टच झाले की ति व ते हे सर्वनाम शब्द साधे नाहीत, जोड आहेत. मूळ सधा सर्वनामशब्द त् आहे. अर्थात् प्राथमिक पूर्ववैदिक भाषेत अद् त् इ, व कश् त् ए अशी तीन शब्दांची वाक्ये असत, अद् ति, व कश् ते, अशी दोनच शब्दांची वाक्ये नसत. एवढ्यानेच अवयवीकरण संपले असे नाही. अद् त् इ व कश् त् ए या वाक्यात असा भेद आहे की पहिल्यात फक्त इ हे सर्वनाम आहे व दुसऱ्यात अ + इ = ए अशी दोन सर्वनामे आहेत. म्हणजे कष्ट या रूपात क्श् त् अ इ असे चार शब्द आहेत. अद् त् इ या वाक्याचा अर्थ तो खातो असा आहे व कश् त् अ इ या वाक्याचा अर्थ तो स्वत: जातो असा आहे. या वाक्यांचे हे दोन भिन्न अर्थ का होतात, ते त्यातील सर्वनामांच्या अर्थावरून सांगता येते. त् म्हणजे तो ह्न ती ह्न ते आणि इ म्हणजे सन्निकृष्ट हाह्न हो ह्न हे. अद् त् इ म्हणजे हा तो खातो. कश् त् अ इ या वाक्यात त् म्हणजे तो, अ म्हणजे अगदी अलीकडला हा आणि इ म्हणजे सन्निकृष्ट हा. कश् त् अ इ म्हणजे अलीकडला सन्निकृष्ट असा जो हा तो जातो. त् चा अर्थ तो याबद्दल वादच नाही. इ म्हणजे हा व अ म्हणजे अगदी अलीकडला हा हे अर्थ या शब्दांचे कोणत्या आधारावर बसविले ? ज्या आधारावर हे अर्थ बसविले तो आधार असा. इदम् एतद् अदस् व तद् या चार सर्वनामांचे अर्थ सांगणारी खालील कारिका सुप्रसिद्ध आहे :
इदम स्तु संनिकृष्टं समीपतरवर्ति चैतदो रूपम्
अदस स्तु विप्रकृष्टं तदिति परोक्षे विजानीयात् ॥१॥

भारतीय आर्यवंश

गोत्रें ब्राह्मणादींचीं

१ अपत्यं पौत्रप्रभृति गोत्रं ( ४-१-१६२) असें गोत्राचें लक्षण पाणिनीनें केलें आहे. सूत्रांतील प्रवराध्यायप्रसिद्ध जीं गोत्रें व प्रवराध्यायाप्रसिद्ध जीं गोत्रें त्या दोन्हींचा अंतर्भाव ह्या पाणिनिप्रोक्त गोत्रशब्दांत होतो असें म्हणतात. नातू आदिकरून जें अपत्य तें गोत्र होय. पुत्रादि जें अनंतरापत्य तें पाणिनीयमतें गोत्र नव्हे. उदाहरणार्थ कुंज हें ऋषिनाम घेतलें, तर अनन्तरापत्यार्थी कौंजि असा तद्धितशब्द साधतो; परंतु पौत्रादि गोत्रार्थक कौंजायन असा तद्धितशब्द होतो. कौंजि हा पुत्र व कौंजायन हे नातवापासून पुढले सर्व वंश्य. एको गोत्रे (४-१-९३ ) गोत्र विवक्षित असतां अपत्यप्रत्यय एकच होतो. मग शंभर पिढ्या कां होत ना. नाहीं तर फक् व इञ् ह्या प्रत्ययांची परंपरा सुरू होऊन ९९ प्रत्यय होऊं लागतील व अव्यवस्थाप्रसंग गुदरेल, म्हणजे कुंज हें ऋषिनाम घेतलें तर नातवापासून पुढे शंभर दोनशें पिढ्यांपर्यंत जेवढें म्हणून अपत्य होईल तेवढें सर्व गोत्रार्थी कौंजायनसंज्ञक होईल, अशी व्यवस्था पाणिनिकालीं असे. पुत्रार्थक रूपें निराळीं व गोत्रार्थकरूपें निराळी. आश्वलायन, बौधायन वगैरे जा सूत्रकार झाले त्यांनीं गोत्राचें लक्षण असें केलं आहे :-

विश्वामित्रो जमदग्नि र्भरद्वाजोऽय गोतमः अत्रिर्वसिष्टः कश्यप इत्येते सप्त ऋषयः । सप्तानामृषीणां अगस्त्याष्टमानां यदपत्यं तद्गोत्रमित्याचक्षते । इति बौधायनः । म्हणजे अगस्त्यासह आठ ऋषींचें जे अपत्य तें गोत्र होय असें बोधायन म्हणतो. बौधायन ऋषींच्या पुत्रादि सर्व अपत्याला गोत्र ही संज्ञा लावतो; स्वतः ऋषींना गोत्र ही संज्ञा लावीत नाही, किंवा पुत्राला वगळून नातवापासूनच तेवढें गोत्र सुरू होतें असें म्हणत नाही. हा शेवटला प्रपंच पाणिनि करतो. पाणिनि सप्तर्षीचें अपत्य कीं कोणाचें अपत्य याचा निर्बंध करीत नाहीं. बौधायन सप्तर्षीचें अपत्य म्हणून निर्बंध करतो. बौधायनादींचें हें लक्षण केवळ सामान्य असून सैल आहे. उदाहरणार्थ, खुद्द बौधायन हा शब्द गोत्रार्थक आहे. मूळपुरुष बुध-त्याचें अनन्तरापत्य बौधिः व गोत्रापत्य म्हणजे पौत्रादि अपत्य बौधायन. अशी बोलण्याची रीति वौधायनाच्या वेळीं होती. परंतु, शास्त्रीय लक्षण करतांना ती रीति लक्षांत न घेऊन, आठ ऋषींचें जें अपत्य तें गोत्रसंज्ञक होय असें सैल, अव्याप्त व अतिव्याप्त लक्षण बौधायनानें केलें आहे.

श्री
वैदिक व पाणिनीय संस्कृत
भाषेचा उलगडा

धातुरूपांचे पृथक्करण
ऊर्फ
अवयवीकरण

१ क्रियापदरूपे होताना धातूंच्या पुढे जे प्रत्यय संस्कृत किंवा वैदिक भाषात लागतात ते प्रत्यय मुळांत उत्तम ह्न, मध्यम ह्न, किंवा प्रथम ह्न पुरुषवाचक सर्वनामे आहेत. प्रत्यय बनलेली ही सर्वनामे स्त्री ह्न, पुं ह्न व नपुंसक या तिन्ही लिंगी अविकृत रहातात. याचा अर्थ असा की लिंगाचे प्रत्यय ऊर्फ शब्द निर्माण होण्याच्या पूर्वी धातुरूपे पूर्ववैदिक भाषेत बनून गेलेली होती. करोमि, करोषि, करोति या रूपातील मि, सि व ति ही जोड सर्वनामे स्त्री पुरुष व नपुंसक या तिन्हीपैकी वाटेल त्या लिंगाची दर्शक आहेत व होती. म्हणजे मुळात मि, सि व ति ही सर्वनामे भाषेत लिंगभेदकल्पना उत्पन्न होण्याच्या पूर्वीची आहेत. प्राथमिक पूर्ववैदिक भाषेत धातुशब्दांच्या पुढेही मि, सि व ति सर्वनामे पृथक् उच्चारीत; जसे अद् मि, अद् सि, अद् ति. ति हे लिंगाविहीन सर्वनाम तो, ती, तें या तिन्ही लिंगी योजिले जाई. हाच प्रकार मि व सि या सर्वनामांचा असे. अद् मि, अद् सि व अद् ति ही प्राथमिक पूर्ववैदिक भाषेत सबंध वाक्ये असत. त्यांचा अर्थ मी खातो खात्ये खाते, तू खातोस खात्येस खातेस, व तो ती ते खातो खात्ये खाते, असा सोयीप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे वाटेल त्या लिंगाचा असे. पुढेही प्राथमिक पूर्ववैदिक भाषा मृत झाल्यावर अद् मि, अद् सि व अद् ति ही वाक्ये, वाक्ये आहेत ही भावना लुप्त होऊन, अतिपरिचयाने ही वाक्ये अद्मि, अत्सि व अत्ति अशी संहित उच्चारिली जाऊ लागली आणि अलीकडे पाणिनी सारखे वैय्याकरण जेव्हा या रूपांचा विचार करू लागले , तेव्हाक अद् या धातू पुढे येणारे जे मि, सि व ति हे शब्द त्यांना ते प्रत्यय म्हणू लागले. प्राथमिक पूर्ववैदिकभाषा मृत झाल्यावर तिच्या जागी जी द्वितीय पूर्ववैदिकभाषा आली ती भाषा बोलणाऱ्यांना अद्मि, अत्सि व अत्ति हे ध्वनी स्वतंत्र शब्द भासू लागले व त्यांच्या वाक्यत्वाचा त्यांना पूर्ण विसर पडला. इतका पूर्ण विसर की अहं अद्मि या प्रयोगात मी मी खातो अशा प्रकारचा द्विरुक्तिदोष होतो याचे भान नव्हे, ज्ञानही त्यांना राहिले नाही.

तसेच एकच प्रत्यय वचनाचे किंवा लिंगाचे दर्शक नव्हते, फक्त कारकाचे दर्शक होते. पुढे लिंगभेद उत्पन्न झाल्यावर प्रत्ययातही लिंगभेद उत्पन्न झाला. कित्येक विभक्तीप्रत्यय केवळ स्त्रीलिंगी शब्दांना लागत व कित्येक केवळ पुल्लिंगी शब्दांना लागत आणि कित्येक शब्द असे असत की ते पुल्लिंगी मानावे की स्त्रीलिंगी मानावे या संबंधानें समाजाचा अद्याप निश्चय झालेला नव्हता. अशा अनिश्चित शब्दांना विकल्पाने वक्त्याच्या लकबीप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे किंवा सामाजिक रूढीप्रमाणे पुंप्रत्यय किंवा स्त्रीप्रत्यय लागत. अशी अनिश्चित स्थिती असता पाणिनीय काल आला आणि पाणिनीयभाषा म्हणून जीस म्हणतात ती भाषा स्थिर झाली. ती स्थिर जर झाली नसती म्हणजे ती बोलणारा समाज स्थिर म्हणजे मृत जर झाला नसता, तर तीत उत्तरोत्तर विकार व बदल अवश्य होत गेले असते. ज्याअर्थी असे विकार झालेले पुढे दिसत नाहीत त्याअर्थी पाणिनीय भाषा बोलणारा समाज पाणिनीनंतर काही काळाने मृत झाला व त्याची जागा प्राकृत भाषा बोलणाऱ्या इतर समाजांनी घेतली. तो इतिहास निराळा, सबब आढावा इथेच पुरा करतो. पाणिनीय भाषेची पूर्वपीठिका थोडक्यात अशी :
१) साधी तुटक शब्दांची अप्रत्यय भाषा प्रथम असलेली दिसते.
२) नंतर प्रथम वचनाचे प्रत्यय जन्मास आले.
३) नंतर विभक्तीप्रत्यय जन्मास आले.
४) नंतर लिंगभेद होऊं लागला.
५) तो परिपूर्ण होतो न होतो इतक्यात पाणिनीयभाषा स्थिर म्हणजे मृत झाली.
येथे सुबन्त प्रकरण संपले. आता तिङन्ड प्रकरणाला म्हणजे धातूंच्या वर्गीकरणाला,
पृथक्करणाला व विवेचनाला प्रारंभ करू.

१२) म्, इ, इँ प्रत्यय योजणाऱ्या गेंगाण्या आर्यांच्या भाषेचा स्पर्श जेव्हा इतर आर्यभाषांना झाला तेव्हा नपुसकलिंगाची कल्पना रानटी आर्यभाषेत शिरली आणि नपुंसकलिंग व नपुंसकेतरलिंग अशी दोन लिंगे प्रथम रानटी आर्यभाषेत उत्पन्न झाली. शेवटी नपुंसकेतरलिंगात पुल्लिंग व स्त्रीलिंग असे सहजच दोन भेद झाले आणि पूर्ववैदिक आर्यभाषेत तीन लिंगे दिसू लागली.

१३) सर्वाच्या शेवटी विभक्तीप्रत्यय उदय पावले. वचनांची तीन रूपे रानटी आर्यभाषेत होतीच. पैकी एकवचनाच्या रूपापुढे विभक्तीप्रत्यय लागून निरनिराळ्या विभक्त्यांची एकवचने बनत, द्विवचनाच्या रूपापुढे विभक्तीप्रत्यय लागून निरनिराळ्या विभक्त्यांची द्विवचनाचीं रूपे साधत व त्रिवचनाच्या रूपापुढे विभक्तीप्रत्यय लागून निरनिराळ्या विभक्त्यांची अनेकवचनाची रूपे तयार होत. प्रथमा जिला म्हणतात तीत शब्दापुढे फक्त वचनप्रत्यय लागलेले आहेत, विभक्तीप्रत्यय नाहीत. म्, इ, इ प्रत्ययवाल्यांचा समावेश प्रत्ययी व उपसर्गी समाजाच्या भाषेत विभक्तीप्रत्यय निर्माण झाल्यानंतर झाल्यामुळे व म, इ, इँ वाल्यांच्या भाषेत वचनप्रत्ययापलीकडे मजल गेली नसल्यामुळे त्यांच्या भाषेतील वचन रूपापुढे पुल्लिंगी विभक्तीप्रत्यय लागून निरनिराळ्या विभक्त्यांची रूपे साधत. म, इ, इँ वाल्यांचा समावेश झाल्यानंतर स्त्रीलिंगाचा उद्भव आर्य भाषात झाला, सबब समावेश झाला त्याकाळी स्त्रीलिंग असे निराळे लिंग भाषेत नसल्यामुळे, नपुसकशब्दांच्या प्रथमा व द्वितीया या दोन विभक्त्यांखेरीज बाकीच्या विभक्त्यांची रूपे पुल्लिंगवत् सहजच बनली. त्यामुळे संस्कृतभाषेस बहुत संदिग्धपणा आलेला आहे. कमलेन या तृतीयेच्या रूपावरून हे कमलेन रूप पुल्लिंगी शब्दाचे आहे की नपुंसकलिंगी शब्दाचे आहे हा निर्णय होत नाही. पण असा संदिग्धपणा संस्कृतभाषेत पुष्कळच आहे, इतकेच की इतर प्राचीन किंवा अर्वाचीन भाषापेक्षा बहुत कमी. उदाहारणार्थ, रामाभ्याम् हे रूप पुल्लिंगी आहे की नपुंसकलिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे की तृतीयेचे आहे की चतुर्थीचे आहे की पंचमीचे आहे, याचा बोध केवळ रूपावरून कोणताच होत नाही, बोध होण्यास संदर्भाची मदत लागते. भ्यस् हा प्रत्यय चतुर्थी अनेकवचनी व पंचमी अनेकवचनी एकच आहे. भ्यम् हा प्रत्यय एकवचनी व अनेकवचनी सारखाच लागे. म्हणजे एकच प्रत्यय अनेक विभक्त्यांचे काम करितो.

६) अ मध्ये महाप्राण घातला म्हणजे ह होई व ह मधून महाप्राण काढला म्हणजे अ उच्चार होई.
७) आर्यपूर्वजभाषात कालांतराने प्रत्यय उत्पन्न झाले व प्रथम प्रत्यय वचनांचे झाले.
८) दोन निरनिराळे वचनप्रत्यय लावणारे दोन भिन्न समाज होते. पैकी एक समाज स्, स् + स् , स् + स् + स् हे प्रत्यय लावी. दुसरा समाज म् व इ हे दोन प्रत्यय आणि इ हा तिसरा प्रत्यय लावून शिवाय एक दोन तीन या मात्रा लावून वचने दाखवी. येणेप्रमाणे दोन वचनप्रत्यय लावणारे दोन समाज होते.
९) तिसरा एक समाज होता तो स्, स् + स् व स् + स् + स् ही संख्यादर्शक अक्षरे नामाच्या पाठीमागे उपसर्ग म्हणून लावी.
१०) या तिन्ही समाजात अद्याप लिंगप्रत्यय किंवा विभक्तिप्रत्यय लावण्याचा प्रघात पडला नव्हता. मनात स्त्रीपुरुषभेद असे, परंतु वैय्याकरणिकलिंग या समाजात अद्याप माहीत झाले नव्हते. अशा काळी उत्तमपुरुषवाचक व मध्यमपुरुषवाचक सर्वनामांची एकद्वित्रिवचनाची रूपे बनली गेली व ती भाषेत इतकी दृढ झाली की लिंगप्रकरणी ही दोन्ही सर्वनामे कायमची अव्यय ठरली. त्वं म्हणजे स्त्री, पुरुष की पोर याचा बोध त्वं या रूपाने होत नाही, तर इतर कोणत्यातरी ज्ञापकाने होतो. याकाळी स् हा संख्यावाचक शब्द योजणाऱ्या समाजाचे सर्व प्रातिपदिकशब्द हलन्त होते. गाव्, हरव्, गुरव्, देवय्, रमय्, मातर्, पितर्, नर्, अभिजित्, प्रतिपद् असे सर्व शब्द हलन्त असत. म् इ व इ हे प्रत्यय योजणाऱ्या समाजाचे शब्द हलन्त व अजन्त असे दोन्ही प्रकारचे असत.
११) उत्तमपुरुषवाचक व मध्यमपुरुषवाचक सर्वनामांची तिन्ही वचनांची रूपे प्रत्ययी
समाजाच्या भाषेत जशी होती तशी उपसर्गीं समाजाच्या भाषेतही होती. म्, इ व इ प्रत्यय योजणाऱ्या समाजात या सर्वनामांची रूपे कशी असत ते समजण्यास काही एक गमक राहिलेले माझ्या आढळात अद्याप आलेले नाही. प्रत्ययी समाजाच्या भाषेत अहम्मि, आमि, मि ही रूपे असत व उपसर्गी समाजाच्या भाषेत अहम् हे रूप असे पैकी आमि, मि ही सर्वनामरूपे धातूपुढे प्रत्ययी समाज लावी व अहम्, अम्, म् ही रूपे उपसर्गी समाज लावी. भवामि, अद्मि या क्रियापदात प्रत्ययी भाषेची रूपे आली आहेत व अभवम्, भवेयम्, अकरम्, तारिषम्, या रूपात उपसर्गी भाषेची रूपे आली आहेत. भवानि रूपात अहन सर्वनाम योजणाऱ्या समाजाच्या प्रत्ययी भाषेचा दाखला राहिला आहे आणि जगाम व ददौ या रूपात आणिक दोन प्रत्ययी समाजाच्या भाषेचे चिन्ह राहिलेले दिसते. आमि, मि रूपे योजणाऱ्या पूर्ववैदिक समाजापासून वर्तमान मराठीतील मी सर्वनामरूप आले आहे. अहम् सर्वनामरूप उपसर्गी भाषेतून वैदिक भाषेत उतरले आहे. तेव्हा वैदिक आर्य ऋषी उपसर्गी भाषा बोलणाऱ्या कोणत्यातरी अनार्य समाजाच्या सहवासाला व छायेखाली काही काळ होते असे झाले. परकीयांच्या दास्यांतून मुक्त झाल्यावर अहं रूप योजणारे ऋषी भारतवर्षात आले व दास्यांत कमाविलेल्या गुणांच्या व तपाच्या जोरावर सर्व आर्यांचे पुढारपण सहजच त्यांच्या गळ्यात पडले. भारतवर्षात निरनिराळ्या पोटभाषा बोलणारे हे सर्व समाज एकवटले आणि वैदिक भाषेपासून पाणिनीय संस्कृत भाषा जन्मली. इतर आर्यसमाजातील कनिष्ट दर्जाचे जे प्राकृत लोक होते त्यात त्या त्या समाजाच्या पोटभाषा तशाच चालू होत्या. त्यांच्यापासून प्राकृत झाल्या व प्राकृत भाषांपासून सध्याच्या मराठी, हिंदी, गुजराथी, बंगाली वगैरे प्राकृतिक भाषा झाल्या.

५० भूर, भुवर्, स्वर् इत्यादी अव्यय नामांच्याहून चिरम्, अकस्मात्, अभीक्ष्णम् इत्यादी अव्यये स्वभावाने निराळी, सबब त्यांच्याविषयी येथे विचार करणे नको, या शब्दांना विभक्तिप्रत्यय होऊन, काही कारणास्तव अविकारित्व आले आहे इतकेच.

५१ आता येथपर्यत केलेल्या पृथक्करणाचा आढावा घेऊ व त्यापासून काय काय नवी
माहिती मिळाली ती कलमवार स्मरणार्थ टिपून ठेऊ :

१) आर्यपूर्वजांची भाषा प्रथमारंभी वचन, विभक्ती किंवा लिंग त्यांच्या प्रत्ययांखेरीज होती म्हणजे अप्रत्यय होती.
२) त्या अप्रत्यकाळी आर्यपूर्वज भाषेत सानुनासिक ह्न भाषा व निरनुनासिकभाषा असे दोन भेद झाले होते. सानुनासिकवाले सर्व स्वर नाकांतून उच्चारीत. निरनुनासिकवाले कोणताही स्वर अनुनासिक उच्चारीत नसत. हा अनुनासिक बहुतेक अनुस्वाराच्या किंवा न् च्या जवळ जवळ उच्चारात असे. कोकणात देवळात हे सप्तमीचे रूप देवळान्त असे नकारमय उच्चारतात, त्याप्रमाणे अनुनासिकांचा उच्चार कित्येक लोकात बहुतेक न् सारखा असे. आताचे लोक याचा उच्चार आतान्चे लोक असा नकारमय होतो किंवा आताँचे लोक असा ओझरता होतो किंवा आताचे लोक असा निरनुनासिक होतो. तोच प्रकार त्या प्राचीनतमकाळी आर्यपूर्वजांच्या भाषेत होत असे, सबब अनुनासिकाचा न होणे नित्यातले व परिचयातलेच होते.
३) त्याकाळी वैदिकपूर्वज कंठ्य उच्चार फार करीत. स चा उच्चार बहुतेक ह सारखा असे.
४) त्याकाळी त चा उच्चार बहुतेक स सारखा असे. उदाहरणार्थ चमस शब्द चमत् असाही उच्चारला जाई व चमस् असाही उच्चारला जाई.
५) त्याकाळी स चा उच्चार ऱ्ह सारखा होई व ऱ्ह चा उच्चार जवळजवळ ह सारखा असे. ह व उपसर्जनीय हे बहुतेक उच्चारात सारखे असत.