Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक २२५

श्री.
१७०१ भाद्रपद वद्य ९.

राजश्री बाळाजी नाईक नाना भिडे गोसावी यांसी:-

विनंती उपरी. राजश्री सखारामपंत बापू यांजकडे सत्रा गांव होते. त्यास, हालीं राजश्री अण्णाजी अनंत अठ्ठाविशीत आहेत. त्यांणीं कारकून पाठऊन बंदोबस्त केला आहे. दरबारीं कोणी गैरवांका समजावितील, यास्तव सूचनार्थ लिहिलें असे. रा छ २३ माहे रमजान. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे विनंती. मोर्तबसुद.

पत्रांक २२४

श्री.
१७०१ भाद्रपद वद्य ८

पुा श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामीचे शेवेसीः-

सां नमस्कार विनंती. चिरंजीव राजश्री नारोबा नानास शिंदे घेऊन आले नाहींत. दरबारचा प्रसंग पडेल तसें करावें. कजायामुळें घेऊन न आले म्हणोन लिा त्यास सर्व प्रकारें आपण आहेत. उभयतां कारभारी यांचे आश्वासन आपणांपाशीं जालें आहे. त्यापक्षीं आतां दिवसगत लागणार नाहीं. जसें कळेल तसें करून आपले जवळ आणावे व फार दिवस जाले आहेत. योगीराजाचे लक्षाचा मार लिा. त्यास यजमान साहेबांचें लक्ष श्रीमंतांपासीं. कोण्ही कालीं दुसरें व्हावयाचें नाहीं. हे खातरजमा आह्मीं ल्याहावी असें नाहीं. अनभव आहेतच. आमची निष्ठा जे आपल्यापाशीं आहे तेच. याचा संशये कोण्ही कालीं न मानावा. आपले चित्तांत नाहीं. परंतु सूचना लिहिली आहे. त्यास, येविशीं कांहींएक चित्तांत न आणावें, याची खातरजमा असों द्यावी. येविसींचें सविस्तर राजश्री बाळ ठाकूर सांगतील त्याजवरून कळेल. बहुत काय लिहिणे? कृपालोभ कीजे. हे विज्ञप्ति.

पत्रांक २२३.

श्री.
१७०१ भाद्रपद शुद्ध १३

पो मिति भाद्रपद वा १० सोमवार.
श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामींचे सेवेसीं:-

सेवक गोविंद गोपाळ साष्टांग नमस्कार विनंती येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. आज छ १२ रोजीं सुरतेहून बातमी आली कीं, शहराहून इंग्रजानें कूच करून, कामरेज पाठीशीं देऊन, मुक्काम केला. भडोचकर व सुरतकर मेस्तर बाटम ऐसे बाहेर निघाले आहेत. मुंबईकर जनराल तेहि सरंजामसुधां येणार, . बंगाल्याहून पंधरा सोळा हजार माणूस आलें, त्यांचीं पत्रें नागपूरचे मुकामींहून आली. त्यावरून हे सर्व बाहेर निघाले. श्रीमंत राजश्री दादासाहेब शहरांतच आहेत. राजश्री बापूजी होळकरहि कागदीं पत्रीं मिळाले ! श्रीमंतांस सामील होणार. नागपुरीहून लोक येतील, त्यासमागमें भोंसल्याकडील फौज येत आहे, ऐसी वदंता आहे. रा राजाराम गोविंद यांची रवानगी महीउत्तरतीरीं होत आहे. समागमें दोन पलटणें दिलीं. वरकड झाडून इंग्रज घाटावर फौजेसुद्धां जाणार, सोनगडास राहणार, ऐसेंहि बोलतात, लाला मुनशी विसां दिवसांचा करार करून गेले आहेत. त्यांचा मार्ग पाहतात. तदनुसार करणें तें करीतील. परंतु जनचर्चा कीं, नागपुरींहून लोक आले ह्मणजे देशीं जातील. याप्रमाणें बातमी आली. ते आपणांस लिा आहे. सत्यमिथ्या नकळे. कूच होऊन बाहेर आले. वे अमदाबादेकडे फौजेची रवानगी. दोन गोष्टी तो प्रमाण आहेत. येविशीं यजमान साहेबांनी आपणांस व कारभारी यांस लिा आहे, त्यावरून अवगत होईल. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञप्ति.

(लेखांक २८) लेख नक्कल आहे. परंतु शुद्ध आहे. मशरुल अनाम=लोकमान्य. मशहुरल हजरत=राजमान्य.
(लेखांक २९) लेख नक्कल आहे व अविश्वसनीयहि आहे.
(लेखांक ३०) लेख नक्कल आहे.
(लेखांक ३१) नक्कल आहे, शुद्ध आहे. ग्रांट डफ ज्याला दर्यासागर म्हणतो त्याचें खरें नांव दर्यासारंग होतें.
(लेखांक ३२) अस्सल आहे.
(लेखांक ३३, ३४, ३५, ३६) अस्सल आहेत. ३४ व्या लेखांकांत यशवंतराऊ शहाजी हें नांव आलें आहे. यशवंतराव शिवाजीच्या समकालीन होता व त्याच्या बापाचें नाव शिवाजीच्या बापाप्रमाणेंच शहाजी होतें. शहाजी हें फारशी-मराठी नाव सतराव्या शतकांत महाराष्ट्रांत रूढ झालें होतें.

शिवाजीनें पाठविलेल्या व शिवाजीला पाठविलेल्या ह्या ३६ पत्रांपैकीं लेखांक २८ अत्यंत महत्वाचा आहे. ह्या लेखांकांतील सर्व शब्द शिवाजीच्या तोंडचे आहेत. हें पत्र शिवाजीनें सांगितलें व बाळाजी आवजीनें लिहिलें. ह्या पत्राची भाषा कारकुनी नसून साहेबी आहे. शिपाई लोकांनीं अमुक रीतीनें कां वागावें व अमुक रीतीनें कां वागूं नये ह्याची फोड शिवाजीनें शिपायास करून दाखविली आहे. हें पत्र केवळ आज्ञापत्र नाहीं. पत्रांत जरब अतोनात दाखविली आहे; परंतु ती शिपायांच्या हिताची आहे असें आंतील मजकूर वाचून शिपायांनाहि वाटावें असा ह्या पत्राचा रोख आहे. हा हुकूम कारकुनाचा नसून खुद्द साहेबाचा म्हणजे शिवाजीचा असल्यामुळें, सैनिकांच्या आदरास तो विशेष पात्र झाला आहे हें उघड आहे. ह्या पत्रांत मराठी व कुणबी असा भेद केला आहे.

(लेखांक ३७) नक्कल. कयाळनिशी=मापा-याची कारकुनी.
(लेखांक ४०) नक्कल. अस्सलांत प्रधानांचे शिक्के आहेत. शिवाजीचा जसा भूखणकवी होता तसा संभाजीचा महेसदास होता. छंदोगामात्य ही पदवी संभाजीनें ज्या इसमास दिली होती त्याचें मूळ नांव कविकलस होतें. छंदोगामात्य ह्या शब्दाबद्दल ग्रांट डफ छंदगौमात्य असें लिहितो व ह्या शब्दाचा अर्थ Expounder of the Vedas, असा टीपेंत करतो. परंतु ह्या दोन्ही गोष्टी चूक आहेत. शुद्ध शब्द छंदोगामात्य आहे व त्याचा अर्थ सामवेदाध्यायी प्रधान असा आहे. छंदोगामात्य म्हणजे सामवेदी ब्राह्मणांची व्यवस्था करणारा अधिकारी. छंदोगामात्य म्हणजे Expounder of the Vedas हा अर्थ डफनें कोठून आणिला ईश्वर जाणे! ह्या जाड्या विद्वानांना अडचण म्हणून कोठेंच पडत नाहीं. ह्या इसमाची दुसरी पदवी कविकलश होती असें डफ म्हणतो. ह्या शब्दांतील कलश ह्या शब्दावरून तत्कालीन मराठ्यांनीं कलुशा हें प्रख्यात विशेषनाम निर्माण केलें. फारशींत व उर्दूंत कलुशा म्हणजे कुंटण असा अर्थ आहे. कविकलश ह्या नांवांतील कवि हीं अक्षरें गाळून कलश ह्या शब्दाचा कळुशा असा उच्चार थट्टेखोर व मत्सरग्रस्त लोक करूं लागले. कविकलश हा काश्मीरी ब्राह्मण होता. विक्रमांकदेवचरितांत बिल्हणानें आपल्या पूर्वजांची राजकलस, ज्येष्ठकलस, मुक्तिकलस अशीं नांवें दिलेलीं आहेत. त्याच धर्तीचें हें कविकलस नांव आहे. डफ म्हणतों त्याप्रमाणें ही पदवी नाहीं येणेंप्रमाणें कविकलस व छंदोगामात्य ह्मा दोन्हीसंबंधानें डफचीं विधानें निराधार व अज्ञानव्यंजक आहेत. कविकलसाला पंडितराई दिली म्हणून डफ म्हणतो तेंहि निराधार आहे. कारण ह्या लेखांकाच्या खालील पहिली सही मोरेश्वर पंडितरायाची आहे. ह्या पत्रांत बाटविला हा शब्द आला आहे भ्रष्ट=बाट्ट=बाट अशा परंपरेनें बाट हा शब्द मराठींत आला.

पत्रांक २२२.

श्री.
१७०१ भाद्रपद.

विज्ञापना ऐसीजे. राजश्री फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर यांचे बोलणें की अंताजी नागेश याचें बहुत प्रकारें मनोधारण करीत होतों की, तुमचा कारभार तुह्मीं करून शिबंदी, सरकार, सावकार यांचा फड (शा) करणें. माझा पेशजीपासून इतबार तुमचे जागां. व सर्व तुह्मीं येख्त्यारीनेंच करीत होतां त्याप्रों करणें, तें न होय, तेव्हां कैद केलें. त्यापक्षीं हिशेब घेणें प्राप्त. अंताजी नागेश यांजकडेस सुरत अठ्ठाविसी वगैरे माहालची मामलत. त्याचे हिशेबाचे फडशे होणें. याशिवाय सरकारांत ऐवज मशारनिल्हे यांनी किती दिला व आह्मांकडून महालचा नख्त रवानगीसुद्धां मारनिले यांजकडे काय पावला, याचा झाडा समजला पाहिजे, बाकी निघालियास तिचा फडशा होणें. आणि अंतोबा यांनी तो सातपुडियांत मवास, कोळी यांजपासून पाहाडी किल्ला पंचवीस हजार रुो देऊन घेतला आहे. तेथें ऐवज व मुलें माणसें सुा जाऊन पावलियास ठीक नाहीं. याजकरितां सरकारांतून बंदोबस्त होऊन मजबुदी जाली पाहिजे. व घन:शाम नारायण वगैरे शिंदे यांजकडून बखेडे करवितील. याची सूचना होऊन बखेडा न होय असा बंदोबस्त जाला पाहिजे. याजकरितां सेवेसी सांगितल्यावरून विनंती लिहिली आहे. सेवेसी श्रत होय. हे विज्ञापना.

पत्रांक २२१.

श्री.
१७०१ भाद्रपद शुद्ध ५

तसे आपली खातरजमा बापूविशी व माझी खातरजमा श्रीमंत तात्यांस याप्रमाणें माझेंहि लक्ष्य त्यांचे पायाजवळ असे. त्यांचे पाय जाणत असतील, जें करमें तें कच्चें लिहून आज्ञा आणऊन पुढें कर्तव्य तें करावें. असें असतां, आपण गोविंद गोपाळ यांचे उत्तराबराबर बापूंस चिठी लिहिली ती मारनिले यांनीं न देतां, आपल्याकडे दुसरें पत्र लिहून पाठविलें. नंतर आपली चिठी आठा रोजांनी दाखविली. चिठी पाहतांच बापूनीं उत्तर केलें कीं, यजमानाची आज्ञा मान्य. तो मजकूर मजलाहि कळला, मीहि उत्तर केलें कीं, तेथें नाईक व तात्या एक जागां, त्यांचा परस्परें दुसरा भाव नाहीं, जे नाईक यांची आज्ञा तेच तात्यांची. याप्रमाणें आपले ठिकाणीं विचार करून गोविंद गोपाळ यांचे लक्षांत चालू लागलों. ऐवजास मार्ग पुसों लागलों, अंतोबाचें लक्ष तेथें श्रीमंतांचे पायाशीं विपरीत जालें. याजमुळें फळ पावला. तो प्रकार सविस्तर पेशजीं लिा आहें, त्याजवरून समजलाच असेल. ह्मणजे अंतोबाचें लक्ष कसें, हेंहि लिहून पाठविलें.दुसरे छ २५ रजबीं गुप्त अर्थ लिहिला. त्यांत फत्तेसिंगराव यांचें लक्ष कसें, अंतोबाचें कृत्रिम कसे जातीचें, पुढें मोठी गोष्ट सांप्रत काळींचे प्रसंगांत हाताखाली असावी याजकरितां आपलेकडे पक्केपणें लिा आणि गुप्तच राखावी असें सुचविलें. तिसरें गोंदबा मामांचें संधान व फत्तेसिंग याचें एकविचाराचें आहे. आपल्याशीं अंतर होणार नाहीं. हें राखोन आज्ञा मानण्याचा मार्ग पाहिला. आज्ञा लवकर न आली. याजमुळें येथें उभयतांस बोध करून, राजश्री बाळाजीपंत, रानडे यांज समागमें तपशीलवार आपल्यास लिहून, आपले विचारें सरकारऐवजाचा निकाल पडावा, आपल्याशीं व तात्याशीं यांचा दुसरा भाव नसावा, हे अर्थ कित्तेक केले असतां, आपण गोविंद गोपाळ यांचे पत्रांचे उत्तर व बापूंस बोलावणें व खातरजमा पडे असें जातीच्या चिठ्या तेथील उभयतां यजमानांच्या घेऊन परभारें पाठविल्या. याजवरून आमचें लक्ष लोभाचें किंवा स्वामीकार्यावर मेहनत करून कारस्तानी केली याचें फळ व बक्षीस जन्माचें आज फावलें असें जालें. परंतु, आमची आपल्याशी एकनिष्ट चांगलीच आहे. याजमुळे येथें गोविंद गोपाळ यांनी अकृत्रीम लोभ करावा, असे यांस ईश्वरें बुध दिली. याजमुळें आपलीं पत्रें आलीं तीं दाखविलीं. परंतु आपण इतका विचार न केला कीं, आपली आज्ञा मोडीत असे जातीचे सेवक नाहींत. तेव्हा पुन्हां त्याच पत्राचें उत्तर ल्याहावें होते कीं, आमचें पत्र त्यांस दाखवावें. तें न ऐकतां अंतोबाचे लक्षीं राहिल्यास याप्रों करुं. तें न जालें. याजवरून बहुत चित्ताचे ठाई आनंद जाला. आजपावेतों येखत्यारी येथे लौकिकांत आहे अशी वाटत होती, ते सर्वत्रांस समजली. वरकड फारसा विषय नाहीं. श्रीमंत तात्यानीं आपली हातचिठी दिली, त्यांत माझें नांव नाही. तेव्हां पुढें येथे मातबरीची अथवा तेथील तात्यांचे विश्वासाचे आहेत नाहींत याची रीत यांस समजलीच असेल. असो. आह्मी सेवक सेवा करून असावें. परंतु यांत आमचें कांहीं भूषण कमी होतें असें नाहीं. ज्यांचे ह्मणवितों त्यांस चांगलें दिसतें करावें. आमचें तो मंगळसूत्र आहे. तेथें विभिचारपण ईश्वर घडू देणार नाहीं. आजपावेतों तात्यांचे ठायीं कसे रीतीचें लक्ष, हें पत्रीं काय लिहूं! मोठे राजकारण बाळाजी माहादेव यांस सांगितलें तरी चिंता नाहीं, ऐसे जातीची माझी निष्ठा, तात्या स्वामींची खातरजमा असतां, अंतोबांच व गायकवाड यांचे कामास पाठविलें. हे दोसी. यांचे सहवासामुळें आमचे ठाई तेथें आपल्यास विक्रत आली. कशी ह्मणतील तरी बापूंचा भरवसा आपल्यास न पडे, असें वाटल्यामुळें गोंदबा मामास परभारें पत्र लिहिलें. माझे ठाईं तात्या स्वामीची आली. याजमुळें खातरजमेची चिठी गोंदबास पाठविली. त्यांत माझें नांवच नाहीं ! तेव्हां तात्यांचे परम आप्त असे येथे सांगतात, तें उगेच, असें यांस वाटावें इतकाच प्रकार, एरवी आमची चित्तवृत्ति एकनिष्ठतेची आहे. त्यापक्षी आह्मांकडून वांकडे पाऊल पडणार नाहीं. पडेल ते दिवशी पुन्हां चरणदर्शनास येणार नाहीं. असे जातीची तात्यांचे पायापाशीं माझी प्रतिज्ञा व आपल्यापाशीं बापूंची, यांत अंतर नाहीं. बापू व मी उभयतां येथें एकत्रपणें आहों. याजमुळें यांसहि येथें समजलेंच असेल. ते भाव दर्शनीं सांगावयाचे. आतां विस्तार कोठवर ल्याहावा ? सारांश, स्वामीसेवेवरी एकनिष्ठ असल्यास ज्या कामास सेवक पाठवावी त्याची खातरजमा जितकी आपल्यास असेल तितकीच सेवा त्यास सांगावी, सेवा सांगोन त्याची प्रतिष्ठा न राखतां, जें काम सांगावें तें काम दुसरे द्वारें विशेष साधलियास त्यास पूर्वसूचना असावी. म्हणजे त्याचें पाऊल त्याप्रों पडतें. आपले मर्जीनुरूप येथें आमचें पाऊल पडेल. येथें कारस्तानीने राहिलों याजमुळे आपली पत्रें आलीं तीं त्यांनीं आह्मांस दाखविलीं. जरी आह्मांस पेसजीं रवाना केलें ते समईंची आज्ञा होती, त्याप्रमाणें येथें चित्तांत आणून अंतोबास कैद केलें. ते समईं आह्मीं येथें आग्रह करितों तरी आज हीं आपलीं पत्रें येतीं ह्मणजे आमचीं घोडीं घेऊन आपल्याकडे रवाना करिते. परंतु सेवक आपल्या हाताखालील, याजमुळें चार संधानें राखोन आहों. आपण संधान केलें त्याजशिवाय दुसरे तरेचें छ २५ रजबीं लिहून पाठविलें आहे. तें यांतील नव्हे. प्रगट होऊ नये. हेच विनंती. पत्र श्रीमंत तात्यांस एकांती दाखवावे. यांत आळस नसावा. माझी शपथ असे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.

पत्रांक २२१.

श्री.
१७०१ भाद्रपद शुद्ध ५

श्रीमंत राजश्री बाळाजीनाईक नाना स्वामीचे सेवेसीं:-

पो बाळाजी महादेव सां नमस्कार विज्ञापना येथील क्षेम ता भाद्रपद शुा पंचमी मुा बडोदें यथास्थित असे. विशेष, राजश्री फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर यांजकडे सरकारचा ऐवज येणें, याजकरितां मजला श्रीमंत राजश्री नानास्वामी व तात्या या उभयतांनी आज्ञा करू. न घनश्याम नारायण याजबराबर रवाना केलें. ते मशारनिल्हे याजसमागमें दुसाणियास आलों. पुढें बडोदियास यावें तों अंताजी नागेश यांचें पत्र घनबास आलें कीं, तुह्मीं बडोदियास न येणें; माघारें, मार्गांत आला असला तरी जाऊन दुसाणियास राहणें. येथून आमचें पत्र यावयाकरितां येईल तेव्हां येणें. याप्रमाणें तापीतीरीं पत्रे आलियावर मारनिल्हे माघारे निघोन दुसाणियास चालले. राजश्री बापूजीपंत सुद्धा आह्मीं उभयतांनीं विचारिलें की, दुसाणियास चलावें, तेथून तुमचे आमचे विचारें ठरेल तसें करूं. त्या जवर दुसाणीं गेलों. तेथपावेतों बापूचा आमचा स्नेह सामान्य होता. पुढें विचार पडला कीं, घनबा गोपाळराव यांस याच यजमानाची आज्ञा, या प्रों यांनीं केलें. पुढें तुमची आमची गत काय ? तेव्हां बापूचा आमचा स्नेह, निखालसतेचा परस्परें खातरजमा होऊन जाहाला, तो कोणे गोष्टीवर आपण म्हणतील तरी, बापूचे ठायीं आपले लक्ष चांगलें व आपलेंही त्यांचे ठायीं निखालसतेचें असें दिसोन आलें. माझा प्रकार ह्मणावा तरी श्रीमंत नाना स्वामीस माझी माहितगार निखालस, सेवक असे जातीची फारशी नाहीं. परंतु, श्रीमंत तात्या स्वामीचे ठाई माझें लक्ष कसें, मजकडून लाभाचा मोहो पडून तात्यांचे पायांशीं दुसरा भाव धरीन व सरकार काम नाशीन, असे जातीची बुध होईल न होईल हें तात्यांचें चित्त जाणत असेल. सर्व प्रकारे प्राण गेला तर द्यावा, हा हेत धरून तात्यांचे पायांशीं अंतर न करावे, असे जातीची परिक्षा असेल, याजकरितां मजला या कामास पाठविले हे जाणोन, राजश्री बापूजीपंत आह्मी उभयतां एकत्र जालों. उभयतांचे भाव स्वामीसेवेवरी सारिखे जाले तेव्हां स्नेह पडला. धनबाच, अंतोबाची आचरणे बापूंस पेशजीं समजली होती. मजला सांप्रत समजली. याजमुळे उभयतांनी एक विचार करून दुसाणयापासून सोनगड निघालों, घनबाचे समाधान राखेन त्याचे विचारें निघालों. अंतर्यामींचा भाव स्वामीकार्य करावे, हा होता. कारण घनबाची मर्जी राखोन, महत संकटानें प्राणास उदक घालोन मार्गातून निघालों असतां, स्वामीसेवेवर एकनिष्ठ माझा तात्यांचे पायांसी दुसरा भाव नाहीं. तेणें प्रों बापूंचा तुमचे ठायीं नाहीं. ह्मणून पकडून बडोदियास पावल. येथे येऊन प्रथम फत्तेसिंगरावसुद्धा अंतोबाची भेट झाली. रंग पाहतां या उभयतांत वैमनस्य ! तेथे आह्मां उभतांस कोण पुसतो ? त्यांत श्रीमंत दादासाहेब या प्रांतें इंग्रजांस येऊन भेटले, याजमुळें आमचें तेज वाढणें कळतच आहे. त्यांत कारस्थानीं करून, अंतोबाचे ठायीं ममता पेशजीपेक्षां फार दाखऊन उभयतांचें वैमनस्य, मागील रंग, अंतोबा काय सांगतो हा प्रकार समजोन घेऊन तपसीलवार अंतोबाची जबानीचा मजकूर साहा बंद लिहून, अम् ( त ) राम भगवत याजसमागमें लाखोटियावर तुमचें नांव घालोन तुमचे विद्यमानें तेथें उभयतां यजमानास विनंती प्रविष्ट करावी, असें सांगोन रवाना केली. नंतर दुसरा प्रकारः माहितगारीचा परिभ्रम नसतां विहंगममार्गेकडून बातमी घेऊन तपशीलवार पत्रें, बापूनीं आपल्यास, मी तात्यास, याप्रमाणें लिहून छ २५ रजबीं रवाना केलीं तीं पावली असतील, त्याजवरून, कांहीं माणूस कारस्तानीचे, असें, आपल्यास व श्रीमंत तात्यास आमचे सुकृतेंकडून चित्ताचे ठायीं वाटलियास, मोठी योग्यता मिळेल, असें भासत असतां, मध्येंच स्तब्ध जालें. आपल्याकडील पत्रांची उत्तरेंच येईनात. तों इकडे फत्तेसिंगराव अंतोबाचें फारच विटून फतेसिंगराव यांणी अंतोबास कैद केलें. गोविंद गोपाळ कारभार करूं लागले. माजी आपल्याकडे सूत्र लाविलें तेंहि चांगलेच केलें. आपले आज्ञेशिवाय आमचे संमत गोविंद मामांस न पडलें असें खरेंच, परंतु हजारकोस उभयतां गेलों

पत्रांक २२०

श्री.
१७०१ भाद्रपद वद्य ८
पो मिती आश्विन शुा ५ गुरुवार

श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामीचे सेवेसीं:-

सेवक गोविंद गोपाळ साष्टांग नमस्कार विनंती येथील कुशल ता छ २२ माहे रमजान पर्यत यथास्थित असे. विशेष. आपण भाद्रपद शुा ९ चीं पत्रें पाठविलीं तीं पावलीं. लिा सविस्तर कळलें. दरबारी मजकूर लिा व ऐवजाविर्सी निकडीनें लिहिलें. त्यास, येथून पर्याय लिहिलें तरी आपणांस प्रमाणे वाटत नाहीं. अस्तु ! ऐवजाची रवानगी केली आहे. पावतील. वरकड योगीराजाचा वगैरे संशय मनांत आणून लिा. व आह्याकडील कोण्ही न्यून्य बोलणार ते समजावीत असतील, त्यास, यजमानसाहेबांची निष्ठा श्रीमंतांस, दुसरी कोण्हे कालीं होणार नाहीं. हे खातरजमा आपणांस असेलच. वरकड आमचा विचार आपल्याशिवाय किमपि होणार नाहीं. शिंदे यांजकडील राजकारण राखावें. त्यास, ते येथें आले आहेत. आपले नजरेस येईल तसें करावें. येविसींचे पेशजीं सविस्तर लिा आहे. त्या अन्वयें बंदोबस्त करावा. गकार. नामक यांसी कामांत घ्यावें न घ्यावें तें लिहावें ऐसे लिहिलें. त्यास, त्यांची पत्रें आह्मांकडे आलीं होतीं. त्यास, आह्मी लिहिलें कीं, नाईकांची मर्जीनरूप राहून काम करित जावें. त्यास, आपण त्याची खातरजमा करून घेऊन कामांत असों द्यावें. सारांश, आपली खातरजमा होत असेल त्याप्रमाणें करावें, तोच आमचा विचार, वरकड रा बाळठाकूर यांसी काल येथने रा केले आहेत. लवकरच येऊन पोंचतील, त्याजवरून कळेल, बहुत काय लिहिणें कृपालोभ असों दीजे हे विज्ञप्ति.

पत्रांक २१९.

श्री.
१७०१ श्रावण अखेर

पो मिति भाद्रपद शुा १ मंदवार.
श्रीमंत राजश्री बाळाजीनाईक नाना स्वामीचे सेवेसी:-

सेवक गोविंद गोपाळ. साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. येथून पत्रें एक दोन शेवेसी पाठविलीं तीं पावलींच असतील. त्यावरून निवेदन जालें असेल, दरबारचा बंदोबस्त यथास्थितपणें राखावा. इकडील कांहीं चिंता न करावी. ऐवजाचे तरतुदींत असो. पक्केपणाचें बोलणें आमचें व राजश्री बापूजी नरसी यांचे करुन मागाहून सविस्तर लेहून पाठवितों. दरबारचीं पत्रें घेतलीं आहेत, तीं पाठवितों, ह्मणून एक दोन पत्रीं लिहिलीं असतां, अद्याप येत नाहींत. तरी तीं पत्रें पाठवावीं. चिरंजीव राजश्री नारोबानाना आपणापाशी आणलेच असतील, तत्राप, आले नसले तरी बहुतशी वोढ न करावी. रा शिंदे यांजकडील बंदोबस्त करून घ्यावा. वरकड, पेशजीं बापूजी नरसी व बाळाजी महादेव यांनी आपणांस व सरकारांत पत्रें लिहिलीं आहेत. त्यावरून सविस्तर अवगत जालें असेल. दोन चार वेळां आपणाकडे पत्रें रवाना केलीं असतां, आपल्यास पत्रें पावल्याचें उत्तर येत नाहीं हें काय समजत नाहीं. मार्गांत कांहीं दिकत पडली असेल तर नकळे. आपण येथील बंदोबस्त करून घेतला आहे. तो पक्केंपणेंच असेल. पत्रें पाठवून द्यावीं. मार्गाची सावधतेविशीं ताकीद काशिदास करावी. वरकड येथील सर्व आपणाशिवाय कांहीं दुसरा अर्थ नाहीं. सेवेसीं श्रुत रोय हे विज्ञप्ति.

पत्रांक २१८.

श्री.
१७०१ श्रावण वद्य ५

श्रीमंत राजश्री तात्या स्वामींचे सेवेसीं:-

सेवक गोविंद गोपाळ साष्टांग नमस्कार विनंती येथील कुशल ता छ १९ माहे सामान पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. श्रीमंत राजश्री सेनाखा. सखेल समशेरबहादर यांचे व राजश्री अंतोबा बावांचें परस्परें वैमनस्य जाल्याविशींचे सविस्तर पेशजी पत्रीं लिा आहे त्यावरून ध्यानांत आलेच असेल. अंतोबा बावांचें व यजमानांचें यथास्थित रीतीनें चालावें यास्तव आज दिवसपर्यंत दोहीं पक्षीं चांगलेच निभावलें. प्रस्तुतकाळी हे येथें आले. यजमान साहेबांनी त्यांस कित्तेक प्रकारें सांगितलें. आपणही त्यांस सांगावयाचे रीतीने सांगत गेलों. परंतु यांचें त्यांचें यथास्थित न राहतां वांकडें पडोन नासलें. हें सविस्तर यजमानांनीं आपणांस लिहिलें आहे. व राजश्री बाळाजी अनंत यांसी रा बाळाजी नाईक भिडे यांजकडे पाठविले आहेत. इकडील अर्थ नाईक आपणांसीं बोलतील, ते ध्यानात आणून बंदोबस्त यथास्थित करून द्यावा. सर्व प्रकारे भरंवसा आपला आहे. वरकड इकडील सविस्तर राजश्री बालाजीपंत आपणांस लिहितील त्याजवरून ध्यानास येईल. आह्मांस सर्व प्रकारें आधार स्वामीचा आहे. बहुत काय लिहिणे? कृपा लोभ करावा हे विनंती.