[ १२८ ] श्री पुरवणी. १७३१.
राजमान्य राजश्री रघुनाथ देव यास आज्ञा केली ऐसी जेः -
कागलास परिघ पडला आहे त्यास अस्मादिकांस हेंच आवश्यक आहे कीं, कागलकरास उपसर्ग न लागावा, टकापैका त्यास न पडावा, सुखरूप असावा ऐसे जरूर आहे तरी तुह्मीं एक करणें कीं, तेथील परिघ निघेल व टकापैका न पडे तें करणें येविशी अनमान न करणे लिहिल्याप्रमाणे वर्तन करणे.