[ ७१ ] श्री. १७१४.
पूर्वी मोंगलाई पादशाही प्रबळ असतां अवघे यवनकर्मे या भूमंडळी होत होतीं. देव, ब्राह्मण, गाई याचे उच्छेद जाले. तेव्हां श्री देवास संकट पडोन शहाण्णव कुळचे मराठे होते त्यांत जातिवंत मराठे पाहून भोसले, जाधव, निंबाळकर, मोहिते, घाटगे, घोरपडे, पालकर, गुजर, अहीरराव, शिरके, माहाडीक, काकडे, भाडवळकर, काटे, ऐसे एकवीस कुळ आईचे व एकवीस कुळ बापाचे निवड करून हिंदुपत सूर्यवंशी व सोमवंशी नेमून राज्यपदवी दिली. त्यामध्यें ईश्वराचे भजनी तत्पर, गाईब्राह्मण याचे प्रतिपालक, अभिमानी, निरंतर भावरत, साधू, सज्जन, भले, रयत प्रतिपालक, दुष्टांचा नि पात करणार, ऐसे योजून, ईश्वरें राजश्री मालोजी राजे भोसले यांसी स्वप्नी अभय देऊन, प्रत्यक्ष गोसावियाचे रुपें येऊन, दर्शन शिखरीं देऊन, भजनास लाविलें. त्यांची स्त्री मातु श्री उमाव्वा, साठे यांची कन्या होती. उभयतांचे निष्ठाकर्म पाहोन सत्तावीस पिढ्यांचे भोसले याचे वंशी राज्यपद दिलें मालोजी राजे यांनीं शिखरीं तळें बांधिले, जीवन केले, जनयात्रा येऊं लागली, इमारती केल्या, व राजश्री लिंगोपंत ब्राह्मण होते, त्यांस देव वरद होऊन त्याणीं बारव पाडिली. ईश्वर संतोषी होऊन मालोजी राजे याचे वंशी पुत्रसंतान दिले राजश्री शहाजी राजे भोसले व राजश्री स्वरूपजी राजे भोसले उभयता बंधूः-
(खालील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)