कळोपंत दफ्तरदार आपले वोओढीचा ह्मणोन वतनाची देखरेख सांगितली, आणि निळोपत हुजूर गेले त्यांस तेथें मोसबियास दोन वर्षे लागलीं. मोसबा वारून वतनावरी यावें तो पातशाहा मेहेरबान होऊन आणिकी ठाणेदारी सागितली तिकडे सात आठ वर्षे राहिले. तेथून पुन्हा वतनावरी आले येते समयीं महालची सरखोती दिवाणातून करून आले, आणि अंमल चालवूं लागले. त्यास, कळोपंत यारिदी याणे दिवाणची पाठी करून निळोपंतासी कलह माडिला याउपरि कितेका दिवसानीं मुरार सोमाजी कळोपताचा नातू याणें मारेकरी घेऊन येऊन मौजे भादाणें येथें निळोपत होते त्यांस व बायका, मुले, चाकर, बटिकीं देखील निळोपंत व त्यांचे पुत्र नारोपत मारिले त्यांत उरता नारोपताची स्त्री उरली. ते तान्हे मुल घेऊन, सोनजीपंत आपले आजे, पळोन घेऊन पुणियासी आली. त्यावर सोनाजीपंत परवरदा जाले. परंतु वतनावर गेले नाहींत आपले तीर्थरुप राजश्री छत्रपतीची सेवा करू लागले यामुळे वतनावर न गेले, परंतु वृत्तीचा कथळा माडिलाच होता. त्यास भानजी मुरारीचा आपला कथळा माडला अहे. परतु त्याणे फौजदाराची व काकाजीची पाठी केली. तथापि आपला मुतालीक जुनदअल्ली सुभा कल्याणी आहे त्याजवळी उभे राहून वेव्हार सागितला. अवघे गोत सुभा मेळवून, करीना मनास आणवून, आमचे वतनसें खरें जाहालें , गोही साक्षीनसी यांसी इनाम गांव पूर्वापार आहेत.
मौजे भादाणे मौजे कुकसें
१ १
याखेरीज हक्क गांव व इनाम व मानपान पेसजीप्रमाणें येविसी पत्रें करून द्यावीं.
आपल्या नावे फर्मान सुभ्यास पत्र
१ १
कल्याणच्या फौजदारास पत्र
१