[ २१ ] १६७१ \ १६७२
( प्रतिपच्चंद्र )
( लेखेव वर्धिष्णु र्वि- )
( श्ववदिता ।। शाहसू- )
( नो. शिवस्येषा मुद्रा )
( भद्राय राजते )
जाबिता तह सन इसन्ने कारणें राजश्री साहेब, तह केला कीं - जो आपला वतन मुलूक आहे त्यापैकीं माहालोमाहालीहून खजाना करावयास पैके आणावे त्याचा खजानाच करुन ठेवावा जे वख्तीं मोगलाशी झगडा सुरू होईल आणि मोगल येऊन गडास वेढा घालतील त्याचे मदतीस जरुर. आणिकी करुन ऐवज जुडेना तरीच खजानाचे पैके खर्च करावे नाहीं तरी ए-हवीं राज्यभागास सर्वही खर्च न करावा ऐसा सागो तह केला असे आणि खजाना करावयाची मोईन केली होनु-
१,२५००० मा । एक लाख पचवीस हजार होन रास
२०००० | कुडाळ. |
२००० | राजापूर |
२०००० | कोळें |
१५००० | दाभोळ |
१३००० | पुणे |
१०००० | नागोजी गोविंद |
५००० | जाउली |
५००० | कल्याण |
५००० | भिवंडी |
५००० | इंदापूर |
२००० | सुपें |
५००० | कृष्णाजी भास्कर |
१२५००० |
येणे प्रमाणें एक लाख पंचवीस हजार होनु खजाना करावयाचा तह केला असे मोर्तब सूद. *
( मर्यादेयं )
( विराजते )