श्रीनिवास प्रा. नकल.
राजश्री देशमुख व गबाजी व्यकंटेश देशपांडिये प॥ चाळीसगांव गोसावी यांसी,
श्नो बापूजी हरि आ॥ व नमस्कार विनंति, उपरि तुम्ही जागीरीकडून नवा अमल आहे त्यास खडकी वगैरे गांवास फर्मासीच्या चिठ्या करून देऊन मौजे मारीं उपद्रव आरंभिला आहे, म्हणोन कळलें. ऐसियास पेशजीं आमल होऊन गेले त्यांणी फर्मासीची वगैरेची चिठी कांहीं केली नाहीं, हें तुम्हास माहित असतां तुम्हीं हालिं त्यास मिळोन गांवावर चिठ्या करून दिल्या. त्यात जागीरदार यांचे चित्तांत कटकट करून बखेडा करावयाचा असल्यास तसेंच लिहिणें ह्मणजे त्यासारखे येथून स्वार प्यादे रवाना करावयास येतील. मग तुह्यांसीच गांठ ! तुमची व कसब्याची खर्चाकडोन खराबी होईल. हें समजोन तुह्मीं त्यास च्यार गोष्टी रीतीच्या सांगोन न ऐकेत तरी तैसेंच पत्राचें उत्तर पाठवणें म्हणजे करणें तें करावयास येईल. पत्राचें उत्तर लौकर पाठवणें. र॥ छ ६ माहे जिल्हेज, बहुत काये लिहिणें ? लोभ करणें हे आशिर्वाद.
भावसिंग चौधरी यांनीं सांगितलें सबब. छ १९ मोहरम.
( श्रावण वद्य ६ मंगळ शके १७१५ )
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)