श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.
विनंति. उपरि. स्वराज्याकडील जुजयातीच्या फर्दा आठ पुढील तोंडी लाविल्या हें समजोन आहे. असें असतां बाबाराव बो ( ल ) त्यानें फडचे होत असल्या अवश्य व्हावे. यांत सरकार काम जाल्यास उत्तम ! हेच इच्छा आहे. यास्तव बाबाराव यांस घेऊन करावें. येणेंकरून निमित्य वारलें. त्यांचाही उमेद समजेल, याचा त।।येक दोन पुरवण्या लिहिल्यावरून सर्व कळेल. त्यास तुम्हीं लिहिल्या अन्वयेंच करावयास येईल. परंतु, यांत येक निश्चय सरकारचा असावा कीं जे फर्द ठराऊन पाठविली याप्र।। जाल्यास ऐकावयाचें. दुसरी तोडजोड नाहीं. असा निश्चये असल्यानंतर बाबाराव यांस घेऊन केल्यास चिंता नाहीं. यांत सरकारचे मुध्यामाफीक-तोडजोड न पडतांकलमें उगवून आल्यास सरकार काम जालेंयास चिंता नाहीं. बाबाराव यांसही दरमियान घेतलें आणि तोडजोड ठरूं लागली तर कांहींच नाहीं. हें तुमचे समजण्यांत असोन याजवर लक्ष असावें. र॥ छ १६ मोहरम हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)