श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.
विनंति. उपरि इंग्रजांकडून पुढील टिपूचे मसलहतसमंधीं पारसी याद आली. त्याची भवति न भवति पाटीलबावा यास घेऊन राजश्री नाना व तात्या यांनीं करून येक कलमाची फर्द ठराविली. यांतील हुस्न लिहिलें. परंतु बोलावयाचे नाहींत. गोविंदराव यांनीं नवाबासी असें बोलावें ह्मणोन पाटीलबावानीं सांगितलें. तो प्रकार लिहिला आहे. परंतु केवळ तसेंच बोलण्यानें इंग्रजापासीं ते सांगतील याजकरितां सहजांत बाराय मसलहत गोष्ट बोलावी व सरकारचें पत्र व याद पाठविली आहे ती नवाबास. याचा जबाब काय ? मनांत वाईट मानितील इत्यादिक मदारुलमाहम यांचे मनांत यावी कीं नाहीं? मध्यस्तांनीं नवाबास अर्ज केला कीं हजरत फरमावितात याचप्रमाणें मदारुलमाहम यांचे मनांत. परंतु सात दफे इंग्रजांकडील न ठरावितां मुख्य सर फर्दच करार करावी. ऐसा आग्रह मदारुलमाहम याचा नाहीं. मगर माहदजीराव सिंदे व हरिपंडतजी यांनीं हे शकल काहडून समजाविलें असेल. यामुळें उपाये नाहीं र॥ छ १६ मोहरम हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)