Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

श्री.
आषाढ वद्य ८ मंगळवार शके १७१५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेशी.

पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लि जावें. विशेष मौजे जवळें पा हवेली परंडा हा गांव माधवराव बांदल यांजकडे होता. त्याजकडून तुह्माकडे रदकर्जी गांव आहे. त्यास बांदल मार यांचा काल जाला सबब त्या गांवची जफ्ती राजश्री रावरंभाजी जयवंत निंबाळकर यांनीं करून कायत यास येथून राजश्री गोपाळराव बक्षीसुद्धां जफ्तीचे बंदोबस्तास पाठविलें. त्यास तेथें बाबूराव बल्लाळ यांनीं बांदला. कडील पैका येणें सबब गांवतजफ्तीस दिकत केली. याचा बोभाट पांजकडे आल्यावर मारनिलेंनीं आह्माकडे सांगोन पाठविलें कीं गोविंदराव यांचा यैवज बांदलाकडे किती ? त्यांत जवळें येथील वसूल काय पावला! ब बाकी यैवज येणें . किती ? याचा हिशेब आणवावा. त्याप्रों फडच्या होईल. जफ्तीस दिकत होऊं नये. त्यावरून लिं असे. तरी बांदल यांजकडे यैवज येकंदर किती, त्यांत वसूल पावला व बाकीं येणें याचा हिशेब तायार पाठवावा. र॥ छ २१ जिल्हेज बहुत काय लिं ? लोभ किजे हे विनंति.
आबाजी बलाळ आवरादकर नि। राजश्री हरिपंत तात्या यांचे मागितल्यावरून पत्र लिहिलें असे.