[ ५५४ ]
श्री.
पो। छ ८
वर्तमान ये घडीपावेतों जालें तें तुह्मांस कळावें याजकीरतां सविस्तर लिहिलें असे. वरकड जयपुराकडून गडा आल्या ह्मणोन लिहिलें होतें. त्यासी, त्या सर्व मिथ्या ! आह्मांकडील मंडळी सर्व कुशाल आहेत. कांहीं घोडी माणसें जखमी जालीं. नागी कोणही जाया नाहींत. ईश्वर इच्छेने सर्व आनंदरूप आहेत. तुह्मी पठाणाकडील व सर्व इतस्तता वर्तमान व पुढें कर्तव्यार्थ जो मनसबा असेल, तो तत्वतां वरचेवर लिहित जाणें. बहुत काय लिहिणें ? छ २५ साबान. हे विनंति.