[ ४०७ ]
श्रीरामनाम शके १६८२ माघ वद्य २.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नाना यांसिः-
प्रति राजा अनुपगीर जय सदाशिव उपरि येथील क्षेम जाणून, आपलें क्षेमं ता। छ १५ रजब पा। कुशलवृत्त लेखन करून, चित्त प्रमोदवीत गेलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस जाहाले, आपणाकडून पत्रार्थ अवगत होत न होत. तेणेंकरून फार चिंत्तावस्थ निर्माण जाहलें. तितक्यांत रा। गणेश वेदांतीचा पत्रावरून सर्व साकल्यें कळों आलें. युधप्रसंगीं, छ ८ जमादिलाखर, पुशे सुध ८, बुधवारी, माहायौवनासीं झुजांत रणमंडलांतून श्रीमंत रायासी दुरानी घेऊन आले. त्या समागमें रा। बापू हिंगणे होते. ते दुसरे दिवशीं तृतीय प्रहरीं नवाब सुजातदौलाकडे वर्तगान आले. त्यासि नवाब सुजातदौला समाचार ऐकोन रायीचे लोभ आपणाजवळ आणविले. तेव्हां आह्मांसी आज्ञा केलें की येथासांग याचें सार्थक करणें. रजा दिले. तेव्हां आपले डेर्यासी घेऊन आलों. रा। गणेश वेदांती, रा। गणेश शेंकर उज्जनकर, रा। कासीराज वकील, वेणीप्रसाद यासमागमें गेलो. तितक्यांत माहा यौवनाचें नशेकची येऊन लोथ परतोन नेलें. दुसरे दिवसीं महाप्रयत्न करावा लागलिया उपरांत माहायौवनाचें शैन्यांतच होते. तिसरे दिवसीं सुक्रवारीं वर्तमान ऐकिलें कीं, रणभूमींत स्वामिर्कायीनीमत्य थोरथोर सरदार कार्येसी आले आहे. ह्मणोन वर्तमान ऐकिलें. त्यासी, नवाब साहेबासी सांगून रणभूमिका शोध केलों. त्यामधें एका शरीरासी मस्तक न होते. तें शेरीरासी पाहोन, कोणाचें आहे ह्मणोन शोध केला. त्या शरीराखालीं सात मोतीं सांपडले. त्यांचे चिन्हें उजवे पायावर केश नव्हते. दुसरें कठारीचे जखम कमरेसी होतें. ते पाहोन, सरकारचे खिजमतगार रविवारी येथ आले होते, त्यांचे नांवें बलराम, वाघोजी नाईक, रा। गणेश वेदांती, वरकड आपले कारकून मंडळी, जे आले होते, सर्वांनी पाहिलें. तेव्हां संताजी वाघ या (णि) उभयतांसी हस्तीवर घालून आणलें. मग चेंदनादिक विधी करविलें. मग अस्ती ब्रामणद्वारेंकडून रा। गणेश वेदांतीनें भागीरथीसीं पाठविलें. याउपरि आपणासी शंदेह : निर्माण जाहलें असल्या तर आला जाठाकडे कांहीं फौजा गेले आहेत त्याची बातमी आणून वकिलाचे पत्रावरून विदित केला पाहिजे. विशेषः
सो।सी गणेश शेंकर उजनकर सां। नमस्कार विनंति उपरिः येथील वर्तमान सविस्तर पत्रीं लिहिलें आहे, त्याजवरून विदित होईल. बहुत काय लिहिणें ! हे विनंति.