[ ४०४ ]
श्री शके १६८२ भाद्रपद शुद्ध ९.
राजश्री पंतप्रधान गोसावी यांसिः--
छ श्रीमत् सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य नेहांकित सटवोजी जाधवराऊ कृतानेक दंडवत विनंति येथील कुशल ........ भाद्रपदशुद्ध नवमी, मुकाम शाहाजानाबाद, जाणून स्वकीय लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे. विशेष. बहुत दिवस जाहाले. पत्र येऊन .....भाळ होत नाही. त्यावरून चित्त सापेक्ष असे. तरी ऐसें नसावें. सदैव आलिया वार्तिकासमवेत पत्र पाठवून सांभाळ करणार आपण समर्थ आहेत. इकडील वर्तमान तरी, वरचेवरी श्रीमंत राजश्री भाऊसाहेब यांच्या पत्रावरून निवेदन होतच असेल. श्रीमंतांचा मुक्काम सालेमार ....गासन्निध आहे. गिलज्यांचा मुक्काम यमुनेपलीकडे आहे. गिलज्याचे श्रीमंतांकडे येतात; यांचेहि त्याजकडे जातात. जाबसाल लागले आहेत. आपला दबाव भारी. श्रीमंत जें करणें तें उत्तमच करतील. आणि श्रीकृपेनें व आपले पुण्यप्रतापें सर्व गोष्टींचे यशच येईल. यानंतर चिरंजीव सुभानबा याची पत्रें व अह्मांकडील परगाणियांतील कमाविसदारांची पत्रें आली. त्यांत रा। राजाराम बाबूराव यांचा मजकूर लिहिला आहे की, परगणियांत फार सख्ति,करितात ; वाजवी अंमलदार करीत नाहींत. वाजवीस कांहीं आह्मी दुसरी गोष्टी ह्मणतच नाहीं. फार बोभाट आला. तेव्हां सेवेसी पत्र लिहावें लागलें. तरी, त्यांस उत्तम प्रकारे ताकीद करून वाजवी वर्तणुक करून सुरळीत अंमल करीत, ते गोष्ट करणार आपण घणी आहेत. आमचें तरी रयतेवरी सर्व आहे. दुस..... राजश्री बाबूजीनाईक वोंकार आपले पदरीचे व राजश्री राघो मल्हार पाबळ....कर या दोघांतून एकास राजारामपंतांकडील मामला आमचा परगणियाचा आहे, तो सरकारांतून इजारा वाजवी ठहराऊन द्यावा. ते रयत लावितील. सरकारचा पैका इजारियाप्रमाणें सरकारांत देतील. आमचा ऐवज आह्मांस पावेल. राजारामपंतच अंमलदारी करितील, आणि दुसर्याचे वस्तु न होय ऐसें नाहीं. ते केवळ रयतेवरी सख्ति करितात. आपण कृपावंत होऊन हे गोष्टी केल्यास आह्मां लोकांचें कल्याण आहे. विशेष लिहावें तरी आपण धणी आहेत. कृपा लोभ असो दिल्हा पाहिजे. * हे विनंति.