[ ४०३ ]
श्रीवरद शके १६८२ चैत्र वद्य
बंधुवर्यासिरोमण राजश्री लक्ष्मण भटजी व ता। घमंडीपंत स्वामी सेवेसीः---
पो। बाबूराव गोपाळ कृतानेक सा। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ १४ शाबान मंगळवार नजीक मलकापुर प्रो। वराड जाणे स्वक्षेम लेखन करावें. विशेष. श्रीमंत राजश्री भाऊसाहेब मजल दरमजल हिंदुस्थान प्रांतांत जातात. तिकडील वृत्त: राजश्री मल्हारजी होळकरांनी जाऊन सिकंदरा मारून चौ कोसावरी राहिले होते तों अबदालीची फौज आली ह्मणोन अवाई आली. हे आपले ठिकाण खबरदार होऊन जमबंदी करून, पुढें रा। गंगाधरपंततात्या व आनंदरावर... व सेट्याजी खराडे यांस फौज देऊन पाठविलें. आपण एकीकडे दा....... स आले. याजकडील त्रिवर्ग सरदार गेले होते. त्यांतून एक गंगाधरपंत कांहीं फौज घेऊन निघाले. वरकड कामास आले. गंगाधरपंत यमुना ......तरोन आगरिया पासी, फतियाबाद आहे तेथें, राहिले. मागाहून खासा ......ल्हारबाही फत्याबादेस आले. अबदाली मथुरेवर आहे. आगरियास येणार. शिंद्यास व होळकरास तों तोलेसी गोष्टी दिसत नाहीं. श्रीमंतांचे प्राक्तन ....र ! यांसच ईश्वर येश येईल. आमचे यजमानाचे हत्तीस खर्चास ....ऊन पाठवणें. आमचे माणसास अगर मुलास न पाठवणें. प्रसंग विलक्षण दिसतो. आह्मीहि नर्मदेपासून स्वार घेऊन येतों. घराचा कारखाना चालूं देणें. कनिष्ट यजमान देशीं राहिले आहेत. सावध राहत जाणें. आह्मी आलियावर चिंता नाहीं, गढींत बिगरपरवानगी आणून जाऊ न देणे. बहुत काय लिहिणे ! हे विनंति.