[ ३७४ ]
श्री रामोजति
( पैवस्ती ) शके १६७९ कार्तिक शुद्ध १३.
राजश्री दामोधरपंत स्वामी गोसावी यांसीः--
विनंति उपर. तुह्मीं श्रीमंतांस लिहिलें होते की, खानखानास लाहुरास घेऊन जावें. ह्मणून सुभेदारांनी आण वाहून घेतली आहे. आणि स्वामीची तो आज्ञा समागमें यावयासी जाली. येविसींचा विचार काय ? तो ल्याहावा. त्यास, लाहुरास खानखानास पोहंचवावयास हे आहेत. त्यास, तुह्मांस श्रीमंतांच्या समागमें जरूर येणें लागतें. याजकरितां तुह्मीं येणें. लाहुरास राजश्री बापूंनीं खानखानास बा। घेऊन जाण्याचा निश्चय करून तयारीस प्रारंभ करावा. येणेप्रों। करावें. ह्मणून श्रीमतांनी आज्ञा केली आहे. त्यावरून तुह्मांस लिहिलें असे. खानखानास बाहेर येऊं न द्यावा. वजिराच्या चौक्या खबरदारीनें वाटेस बसवाव्या. हे विनंति.
पो। छ १० रा।वल.