[ २९१ ]
पौ। छ १ रबिलाखर. शके १६७५ माघ शुद्ध २.
निघून मरणें जालें तर मरेल; परंतु पातशाहासी व तुह्मांसी अन्यथा विचार करणार नाहीत. त्यासी तो ईश्वरें मारिलें आहे. तुह्मीं सुभ्याकडे रूख केला ह्मणजे सत्तर लाख रुपये तलब लोकांचे निघाले आहेत ते प्राण घ्यावयासी अंतर करणार नाहींत. ते वेळेस अयोध्येंत आणून, तुह्मांस अमदखां येऊन, हात रुमालानें बांधून भेटवूं. वजिर अजम ह्मणतील, पांचा स्वारांनशीं अहमतखानानीं यावे. बल्की, यांहीं डेरे, अयोध्येकडे कूच करून, तुह्मांस अहमतखानाकडे पाठवावें. तुह्मी इकडून अहमतखानांनी यावे. यांच्या तुमच्या भेटी होऊन सलुख ठैरावाल. सलुख बिघाड ठैरावाल. बिघाड ठैरावाल तरा, त्याचा तुमचा शिष्टाचार हावून मग क्षात्रीय धर्माचा आहे तर, जे वागवितील तर परस्पर क्षात्रीय धर्म करून आपुण सर्वां ठायीं मेजमानीस जाऊन, यखलासानेंच त्यांचे घर धुवूनहि काढावें; आणि सर्वांत नेकनामहि असावें. जैपुरकरास सुभेदारांहीं आणवून राज्य स्थापिलें. टिका तो आला नाहीं. तो काढवून राज्य स्थापना केलियावर त्यांचे लोकांकडून त्यांच्या किमपिहि ध्यानांतहि नसतां शहरावर दंड ठैरला. याकरितां शहरांनीच प्राणाचें गिर्हाईक भेटलियावरी बळवायआम् जाला. या गोष्टीस माधोसिंगांनी काय करावें ? कोण्ही समाजतीस न आला ह्मटलें, तरी तुह्मी समाजतीस आलेत. रफा जाली. आतां सुभेदारांस ह्मणावें जे, माधोसिंगास खंडेरायाप्रों।च जाणा; तैसाच रामसिंग जाणा; आणि पातशाहास सर्व प्रकारें आपल्याकडे मुतवजे जाणून, उभयतां सुभेदारांहीं चार दिवस वकील मुतलक करून, पठाणास आज्ञेत ठिवून, नवाबास सुभ्यास पोहंचवावा. मग च्यार रुपये अधिक मिळवोत अथवा कमी मिळवोत, आपला बोल वर राहून रसायनसें दिसेल. त्यास, वजिर अजम या गोष्टीस कदापि चाहणार नाहीत. सार्वभौम अमात्याचा मित्र आहे किंवा नाहीं हें पुर्ते जाणत असतां, कां उडी घालितात ? त्यासी नामकदुर सांगणे ; नाहीतर बरसात आलियावरी यांसी सुभ्यांत पोहंचावणे. कासचे इकडे यमुनेस पोहंचवायासी वजिरासी येणें लागेल. जर येसे जाले तरी, आपेश मर्हाष्टास आलियावरी दुनियांत जागा राहणार नाहीं. वजीर बुडालिथावर, कोण्ही तर्ही बरें ह्मणणार आहे. तेव्हा सर्वांस बुडविलियाचे सर्व बोढें घ्यावयासी तयार होतील. जर मित्र मित्र ह्मणून काम करून घ्यावे, आणि विलायतींत एक रांघोवा पडे, आणि सहुलतीनें यांचा अमल टंट्यांत केला हे नांव करून कोठें न जुंझती हिकमतीनेंच एक्या कामाचें विनाजोखों येश घेऊन बाविसा सुभ्यांत हुकमे करून दक्षण हिंदुस्थान आपली करा, हें उपयोगी असेल ते विचारून कोणेहि प्रकारें लौकर संभाळणे. आणखी चौ दिवसां गुंतेस कां ? कुंथेस का ? ऐसे होईल. अयोध्येकडे गेलियावर सफदरजंग लाखा स्वारांचा सरदार आहे. अहमदखानाचें दिवाळें निघेल. आपल्या आपुण यांजला उठवणें येईल, तेव्हां ठिवा न ठिवा, मारा न मारा. वजिरास उभयथा सुभेa