[ २५७ ]
श्रीमार्तंड शके १६७४ भाद्रपद शुद्ध ९.
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री सुभानबा यासीः-
सटवोजी जाधवराऊ आशीर्वद येथील क्षेम ता। छ. ८ जिल्काद सोमवार मुकाम जेजोरी यथास्थित असे. यानंतर ;--- आजि सोमवारी दीडप्रहरां आईसाहेब उपरांतिक पेशव्यांच्या हवेलींत आली. तेथेंच तक्ता मांडून आराश केली होती. घरांत घेऊन बैसली. श्रीमंत उभयतां बंधू सरदार लोकांनशीं वाडियांत मुजरे करून बैसले. मातुश्रीचा निश्चय होती की, एकटे नानाशी मात्र जें बोलणें तें बोलोन. त्यावरून उभयतांचे मात्र साहा घटका खलबत बोलणें जाहालें. राजाजवळी राजश्री बाबाजी जाधव याजकडील लोक चौकीस होते ते उठून यांणीं चौकी आपली ठेविली; बाबाजी जाधव यासी निरोप दिल्हा. त्यांणी कूच करून आईसाहेबांस मजुरा करून गेले. हा राजा सत्य नाहीं, ये गोष्टीची मर्हाटियाजवळी उदईक शफतपूर्वक सांगितलें, राजश्री संभाजी महाराज आणून तक्तावरी बसवावें; दुसरें, राजाचें नसल नाहीं ह्मणोन आईसाहेबांनी साफच सांगितले. याउपरि, गुंता राहिला नाहीं. शंभुमहाराजहि पालीस आले ह्मणून बातमी आली. तेहि लौकरच येतील. उद्याच्या दिवशीं आईसाहेब श्रीचें देवदर्शन करून पुण्यास जावयाचा विचार होईल. आईसाहेबांचे मनांतील किलाफ दूर होवून यांचे मनोदयानरूप राज्यभार करावासा जाहाला. उभयपक्षीं विकल्प उठोन निःशैल्य जाहालें. याउपरि जे मनसबे होणें ते करवीरनिवासी आल्याउपरि, पुण्यांत होतील. मर्हाटे याजपासी शफतपूर्वक, हे राजा नसल नव्हे, ह्मणून सांगितलें. याप्रमाणें तह जाला आहे. * हे आशीर्वाद.