श्री
स्मरण. चैत्र शुद्ध ११ सोमवार शके १६७७. बापोजी केशव सबनीस याचें तटूं गंगेस न्यावयास मागितलें. त्यानें दिलें.
१ तटू जरदा कि॥ रु॥ २० वीस त्याणीं घेतला ह्मणून भवानबा देशमुख याचे गुजारतीनें सांगितलें.
३ सामान तट्टाचें.
१ खोगीर नवें
१ तंग पुस्तंग
१ लगाम जीन
----
३
त्याच्या भावानी तटू आणून दिल्हेस किंमतहि सांगितली बाजीबांनीं.
शके १६७७ युवानाम संवछरे. चैत्र शुद्ध सन ११६४
शुद्ध १० रविवारी संभाजी चावट श्रीविठोबाचा भक्त विठ्ठलवाडीचा वारला असे. १
शुद्ध १४ सह १६ गुरुवारी अळंदी अलकापुरी गंगेस घरीचीं मुलेंमाणसे गेली. तेथें अलीकडे तुळबाजी ताकपीर याचे वाडीपाशीं मुक्काम केला. आधीं देवदर्शनास गेले. तेथे सिद्धेश्वराचे देवळांत मातुश्री भिवाबाई जातांना डावे हातावर पडली. हात डावा मोडला. दुसरे रोजी पुणेयासी डोली चर्होलीची मिळवून पाठविली. याप्रों। जालें. जिवाजी न्हावी अलकापूरकर दंडापाशीं मोडला असे.
वद्य १२ सह १३ बुधवार त्रिंबकदादा व शिवराम गोविंद र्धा। गोविंदराऊबाबाकडे पाठविले की, श्रीमंत पुढें आले आहेत, तुह्मी व आह्मी भेटावयासी जाऊन, जर एक पहिल्यापासून आहे त्याप्रों। करूं. त्यानीं जाब पाठविला कीं, तुह्मी शेलापागोटें घेणें आणि तुह्मी पागोटें बांधा, आह्मी शेला उकलून अंगावर घालू. त्यास, ही गोष्ट कांहीं पहिल्यापासून जाली नाहीं, तें नवें कसें करावें, असें ह्मटलें. त्यास, ते उठोन वरसास पुढें जातात. त्यांस सांगोन पाठविलें कीं, तुह्मी न जाणें, जेव्हां सिधांत नजरेचा होईल तेव्हां जावें. तैसेंच नरसिंगराऊचा जाबसाल केला की, पहिल्यापासून आह्मी करीत आहों. नवी तुह्मी करूं द्या ऐसें ह्मणतात. आमचे वडील, दवलतराऊबाबा व दाजीबाबा व वरकड भाऊ जमा करूं आणि विचार करून सांगो, ऐसें लांबणीखालीं जाबसाल केले. इतका मजकूर हेच दिवशीं जाला असे.