माघ मास.
शुद्ध १ सोमवार ढोले माळी याच्या शेतांत वस्ती राजश्री जिवाजीपंतआण्णा यानीं केली. त्यास, त्यापाशीं जागा मागोन खासगत घेतली. लांबी हात ९० रुंदी हात ५०. येणेप्रमाणें मोजून घेतली असे.
शुद्ध १० बुधवार आबा देशपांडे यासी देवआज्ञा जाली. दोप्रहरा दिवसा काल जाला असे.
शुद्ध ११ गुरुवार लाडूबाई शितोळे लवळियांत होती. त्यांस बरें वाटत नव्हते. त्यांस देवआज्ञा जाली. खबर आली.
वद्य ९ मंगळवारीं दोप्रहरा दिवसास लक्षुमबाई धडफळियास देवआज्ञा जाली.
वद्य ९ बुधवार त्रिंबकराम धर्माधिकारी याची द्वितीयसमंधाच्या स्त्रीस मधरा जाला. तीस सायंकाळच्या च्यार घटिका दिवसास देवाज्ञा जाहाली,
फाल्गुन मास.
शुद्ध १० शुक्रवार तान्हाजी सोमनाथ हवालदार काशीहून नाशीक त्रिंबक करून घरास रात्रीं आले.
शुद्ध १५ बुधवार.
सुभानजी पा। लोणकर मौजे मौजे वडगांव लोहगांव येथील
कोंढवें याची होळी येडझवेपणें होळी दोन चार वरसें पडली
बाळकृष्णपंतांनी पाड़ली जिवाजी- होती ते शिंदियास लावावयास
मुळें. सांगितली.
वद्य १ गुरुवारी लवळेकरं शेटगा आला कीं, तळजाईजवळ होळीस पोळी देवाची आपण लावीत होतो. त्यास, नागोजीने द्वाही देऊन, होळी लावू दिल्ही नाहीं. गोंवार्या राहिल्या.
वद्य ६ मंगळवार खबर आली कीं, रघोजी भोंसले यास फाल्गुन शुद्ध तृतीयेस देवआज्ञा जाली.
वद्य ३० गुरुवार सह चैत्र शुद्ध १, ते दिवशीं रात्रीं राजश्री जिवाजीपंतआण्णा यांनीं गोविंदराऊ देशमुख व लाडूबाई देशमूख यांज ला बोलावूं पा।. तेथें उभयतांहि गेलीं. त्याजवरी तेथें जाबसाल पडला कीं लवळियांत श्रीतळजाईची होळी होते. तेथें त्या होळीस देवाची पोळी सालास लागत असते. त्यास, यंदा होळी पडावयास कारण काय ? ऐसें त्रिंबकराऊ याजला पुशिलें. त्याणीं जाबसाल केला की, बाईची व आमची चित्तशुद्ध नाहीं. यामुळें आह्मीं दोही दिल्ही. तेव्हां ते बोलले की, चित्तशुद्ध नाही, तर तुह्मी त्याणी जें बोललें तें बोलावें. देवाची होळी पाडावयास गरज काय ? तेव्हां ह्मणाले आह्मापासून अंतर पडिलें. याउपर होळी सुखरूप करावी. त्याजवरी जिवाजीपंत होळी जाळावयाची आज्ञा केली.