भद्रपद मास.
शुद्ध ३ बुधवार.
बापूस बरें वाटत नव्हतें, राणोजी बावकर शेताहून
त्यामुळें हैराण होऊन पोट रात्रीं घरास आला आणि
दुखत होतें. पाहटे मेला. पाहटे मेला.
शुद्ध ९ मंगळवार. श्रीदेव चिंचवड, वानवडीहून पर्वतीस आले. श्रीमंतांनीं डेरे राजश्री मोरोपंत नाना याचे बागांत दिल्हे. श्रीमंत भाऊ डेरेयासीं देवाकडे येऊन गेले.
शुद्ध १० बुधवार, श्रीमंत नाना व भाऊ श्रीचें दर्शन करून गेले.
शुद्ध ११ सह १२ गुरुवार. श्रीमंत उभयता प्रसादास आले. त्यांस वस्त्रे देऊन वाटे डेरियांतून लाविले.
शुद्ध १३ शुक्रवारीं श्रीदेव श्रीमंताच्या वाडियांत येऊन, भाऊ दरवाजियापावेतों सामोरे येऊन, वाडियांत नेऊन, श्रीस शाल १ व धोतरजोडा १, मोतींस पदकें सुमारे २ दोन, मुलास त्यांचे कडीं सुमार ३ तीन दिल्हीं. वस्त्रे अवघे भाऊबंद वगैरे मिळोन गाठोडीं बांधोन दिल्हीं. तिवटें २५ व शेले २५ एकूण पन्नास सणगें दिल्हीं. याखेरीज देवाचे बायकांस लुगडीं सुमार १२ बारा दिल्हीं. ऐसा बहुमान करून नदीपार चिंचवडास गेले.
शुद्ध १५ रविवार. खामगांव बु॥ व येवतकर यांचे शिवेचे भांडण होतें. यासी गोत भरतगाऊ व राहू व दहीटणे व माळशिरस मिळवून जामीनकतबे घेतले. आणि खामगांवकर निळनाक महार याणें मान घेऊन शिवेनें चालेला. त्यास कांहीं खताखानत जाली नाहीं. खामगांवकर खरे जाले. येवतकर खोटे जाले. येवतकरापासून कतबा लेहून घेतला कीं, आपण खोटे. दिवाणांत कतबा घेतला. असें जालें.
वद्य २ मंगळवारी अवशीस रात्रीं भिऊबाई टुल्लीण, खंडो रघुनाथ याचे सासूस देवआज्ञा जाली. राघो देवराऊ याणें हातीं मडकें घेऊन विस्तो नेला.
वद्य ३ बुधवार. मावजी इंगळे दिम्मत देवजी ताकपीर, पा। मौजे चिखली, ता। हवेली, यासी न्हावी गोसावी यांची माणसे लावून पागोटें काहाडून पिसोडे बांधोन बाजाराबाजार हिंडोन माथा शेंदूर व मुलापासून माळ घातली. त्यावर नारोपंतनानानीं माणसें पाहून चावडीस नेलें.
वद्य ४ गुरुवार. मुजफरजंग गारदी याजकडील दिवाण होता खासगत. त्यास ती प्रहरी रात्रीं त्याचें डोकें कापलें. श्रीमंत उभयतां थेऊरास गेले होते. त्यांची कफन आणोन त्यास माती दिल्ही. डोकें कोण्ही मारलें त्याचें ठिकाण लागत नाहीं.
वद्य ११ गुरुवारीं बहिरोबा रात्रीं परसांतल्या माळ्यावरी भेऊन माळ्याखालें उडी टाकिली. खाले माकणीवर पडोन मांडी जाया जाली. मग कमानगार आणोन बांधली.